शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२0 शेतक-यांना मिळाला सौर कृषिपंपांचा आधार!

By admin | Updated: June 6, 2016 02:38 IST

अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली.

अतुल जयस्वाल/ अकोलाकेंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांमध्ये शेतकर्‍यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली आहे. यापैकी २0 शेतकर्‍यांच्या विहिरींवर सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्हय़ांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिक वीज निर्मितीकरिता असलेल्या र्मयादा आणी वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकर्‍यांना अनुदानावर सौर कृषिपंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकर्‍यांना ७.५ अश्‍वशक्तीपासून ते ३ अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर उज्रेवर चालणारा कृषिपंप देण्यात येतो. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार ५ टक्के अनुदान देते. उर्वरित ६0 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषिपंप मिळविता येतो. लाभार्थी शेतकर्‍यांच्या सातबारा उतारावर कर्जाचा बोजा लावला जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत महावितरणचे अधीक्षक अभियंता हे सदस्य सचिव म्हणून आहेत.