शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

२0 शेतक-यांना मिळाला सौर कृषिपंपांचा आधार!

By admin | Updated: June 6, 2016 02:38 IST

अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली.

अतुल जयस्वाल/ अकोलाकेंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांमध्ये शेतकर्‍यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली आहे. यापैकी २0 शेतकर्‍यांच्या विहिरींवर सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्हय़ांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिक वीज निर्मितीकरिता असलेल्या र्मयादा आणी वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकर्‍यांना अनुदानावर सौर कृषिपंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकर्‍यांना ७.५ अश्‍वशक्तीपासून ते ३ अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर उज्रेवर चालणारा कृषिपंप देण्यात येतो. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार ५ टक्के अनुदान देते. उर्वरित ६0 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषिपंप मिळविता येतो. लाभार्थी शेतकर्‍यांच्या सातबारा उतारावर कर्जाचा बोजा लावला जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत महावितरणचे अधीक्षक अभियंता हे सदस्य सचिव म्हणून आहेत.