शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी २0 कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 02:41 IST

अकोला जिल्हय़ात १५ सिंचन प्रकल्पांची कामे.

अकोला, दि. १७- जिल्हय़ातील १५ सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना मोबदल्याची रक्कम देण्यासाठी गत फेब्रुवारी अखेरपर्यंत २0 कोटी १८ लाख ३९ हजार रुपयांचा निधी उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला असला, तरी सिंचन प्रकल्पांची कामे मात्र अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे भूसंपादनात अडकलेली सिंचन प्रकल्पांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हय़ातील अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर या चार तालुक्यांत सन २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत १५ सिंचन प्रकल्पांची कामे मंजूर करण्यात आली. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील कासारखेड, उरळ बु., अंत्री मलकापूर, कारंजा रमजानपूर, अंत्री मलकापूर, कारंजा रमजानपूर, मनारखेड व लोहारा. मूर्तिजापूर तालुक्यातील आलापूर (उजाड), रोहणा व पोही. अकोट तालुक्यातील शहापूर, दिवठाणा व पणज आणि पातूर तालुक्यातील जिरायत पातूर इत्यादी १५ सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. मंजूर सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने, जिल्हय़ातील १५ सिंचन प्रकल्पांची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाही. आक्षेपांचा निपटारा, प्रकल्पांसाठी जमीन संपादनासाठी शेतकर्‍यांना मोबदला देण्यासाठी निधीच्या अभावात सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रेंगाळली. १५ सिंचन प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मंजूर करण्यात आला असून, मोबदल्याच्या रकमेपोटी शासनामार्फत निधी उपलब्ध झाल्यानंतर २0 कोटी १८ लाख ३९ हजार ५९ रुपयांचा निधी गत २ फेब्रुवारीपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामार्फत अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला. या निधीतून प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जमीन मोबदल्याची रक्कम वितरित करण्यात येणार असून, मोबदल्याची रक्कम शेतकर्‍यांना वितरित करण्यात आल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंचन विभागामार्फत सिंचन प्रकल्पांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने भूसंपादनात अडकलेली जिल्हय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.