शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

दिव्यांग प्रमाणपत्रासाठीचे १८१४ प्रस्ताव फेटाळले!

By admin | Updated: October 10, 2016 03:08 IST

दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित.

अतुल जयस्वालअकोला, दि. 0९-दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्याचे काम कुर्मगतीने होत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे काम रेंगाळले आहे. गत सहा महिन्यांत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या जिल्हय़ातील ३७७२ दिव्यांगांपैकी १८१४ जणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे या दिव्यांगांवर शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्यांना बस व रेल्वे प्रवास भाड्यात सूट देणे तसेच शासकीय नोकर्‍यांमध्ये आरक्षण दिले जाते. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दृष्टिदोष, कर्णबधिर, शारीरिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती अर्ज करतात. यासाठी ४0 टक्के दिव्यांग असणे गरजेचे आहे. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेकडो दिव्यांग अर्ज करतात. या दिव्यांगांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्यावतीने दिव्यांग प्रमाणपत्र जारी केले जाते. यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांगांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण तपासणी केली जाते. अपंगत्वाचे प्रमाण ४0 टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्यांना दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी केल्या जाते. जिल्हय़ात १ एप्रिल २0१६ ते ९ ऑक्टोबर २0१६ या कालावधीत ३७७२ दिव्यांगांनी सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १५४७ जणांना प्रमाणपत्र जारी करण्यात असून, १८१४ जणांचे अर्ज खारीज करण्यात आले, तर ४११ अर्ज प्रक्रियेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान १ एप्रिल ते ९ ऑक्टोबर २0१६ पर्यंत ३७७२ अर्जदारांनी अर्ज केले पैकी १५४७ प्रमाणपत्र देण्यात आले यापैकी १८१४ अर्ज खारीज करण्यात आले असून याप्रक्रियेत ४११ अर्ज आहेत. ही टक्केवारी ८९ आहे.टक्केवारीत बाद होतात अर्ज*दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शेकडो जण अर्ज करतात. अर्ज केलेल्यांना आधी शारीरिक तपासणीला सामोरे जावे लागते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यासाठी विशेष व्यवस्था आहे. *अपंगत्वाची टक्केवारी ४0 किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तरच संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्रासाठी हिरवी झेंडी मिळते. *निश्‍चित टक्केवारीपेक्षा अर्धा टक्का कमी असला तरी संबंधित व्यक्तीचा अर्ज बाद केल्या जातो. या टक्केवारीच्या घोळामुळे अनेक दिव्यांगांना प्रमाणपत्रापासून पर्यायाने शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.