शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राज्यात सात महिन्यांत १८ हजार नवे रूग्ण

By admin | Updated: November 30, 2014 22:15 IST

आज जागतीक एडस निर्मूलन दिन

राजेश शेगोकार/बुलडाणाबी पॉझीटिव्ह असे म्हटले की दिलासा मिळतो, सकारात्मक विचार करण्याचा संदेश मिळतो; मात्र हाच ह्यपॉझीटिव्हह्ण शब्द एचआयव्ही चाचणीतून समोर आला तर संपूर्ण आयुष्यच उद्धवस्त झाल्याची भावना होते. अशा एचआयव्ही पॉझीटिव्ह रूग्णांसाठी शासन अनेक सुविधा देत असली तरी रूग्णांचा आकडा वाढताच आहे. गत एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्यांच्या काळात राज्यात तब्बल १८ हजार रूग्ण नव्याने आढळले असून एडस् निमुर्लनासाठी अजूनही व्यापक जनजागृतीची गरज असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखीत झाली आहे.गत सात महिन्यांमध्ये सामान्य व गरोदर माता रूग्णांची तपासणी केली असता १८ हजार ३५ रूग्ण एचआयव्ही पॉझीटिव्ह आढळले आहेत. सामान्य रूग्णांध्ये एक लाख ११ लाख ६३ हजार ७१७ रूग्णांची तपासणी केली असता, त्यामध्ये १७ हजार १८३ रूग्ण पॉझीटिव्ह आढळले आहेत. १0 लाख ६५ हजार १0 गरोदर महिलांपैकी ८५२ महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. गरोदर महिलांसाठी व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. नियमित तपासणीमध्ये उपचारही वेळेवर दिले जातात. त्यामुळे तपासणी केलेले रूग्ण व प्रत्यक्षात लागण झालेले रूग्ण यांचे गुणोत्तर कमी आहे; मात्र सर्वसामान्य रूग्णांच्या बाबतीत आकडेवारी चिंताजनक आहे.एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबधित रूग्णाला एआरटी केंद्रावर उपचारासाठी यावे लागते; मात्र अनेकदा रूग्ण भितीपोटी किंवा बदनामीपोटी एआरटी केंद्रावर तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे एचआयव्ही पॉझीटिव्ह रूग्णांची संख्या वाढतीच असल्याचे मत बुलडाण्याचे एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी व्यक्त केले. रूग्णांनी योग्य उपचार घेतला तर त्यांना फायदा होतो व दैनंदिन जीवन जगतांना कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे अशा रूग्णांनी उपचाराकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.