शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

१८ हजारांवर तक्रारींचे निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:17 IST

अकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणचे ग्राहक संपर्क अभियान १६ परिमंडळांमध्ये १७४६ ग्राहक मेळावे‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडळांमध्ये जुलै महिन्यात हे ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले. यांतर्गत राज्यभरात १,७४६ ग्राहक मेळावे घेण्यात आले. या ग्राहक संपर्क अभियानात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली, तसेच सदोष किंवा चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारीही जागेवरच सोडविण्यात आल्या. राज्यात या अभियानांतर्गत एकूण सुमारे २२ हजार ९६६ तक्रारी व अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८ हजार ५५५ तक्रारी, अर्जांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित ४ हजार ४११ प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत असून, त्याची माहिती संबंधित वीज ग्राहकांना देण्यात येत आहे. महावितरणच्या ग्राहक संपर्क अभियानाला संपूर्ण राज्यात वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला, तसेच या अभियानात नवीन वीज जोडणी, इतर वीज सेवेविषयक तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सर्वाधिक तक्रारी सदोष मीटर रिडिंगच्याराज्यभरात घेण्यात आलेल्या या ग्राहक मेळाव्यांमध्ये एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीज बिलिंगबाबत होत्या. त्यावर महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात वारंवार चुकीचे रिडिंग घेणार्‍या एजन्सीवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले आहेत.