शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

डेंग्यूसदृश्य तापाने पाच वर्षात घेतले १७५ बळी

By admin | Updated: October 12, 2014 00:41 IST

गत पाच वर्षात राज्यभरात डेंग्यूसदृश्य तापाचे १३ हजार ९८१ संशयीत रुग्ण.

बुलडाणा : गाव परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष आणि वातावरणातील बदलामुळे वाढलेली डासांची उत्पत्ती, आदी कारणांमुळ राज्यभरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. गत पाच वर्षात राज्यभरात डेंग्यूसदृश्य तापाचे १३ हजार ९८१ संशयीत रुग्ण आढळून आले. त्यापैकी १७५ लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी शहरी आणि ग्रामीण भागातही डोके वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर्षी हिवताप विभागाने डेग्यूच्या ३५00 संशयीत रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी विभागीय प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करुन, डेंग्यू नियंत्रणासाठीच्या उ पाययोजनांचे प्रशिक्षणही दिले होते; मात्र तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणार्‍या आरोग्य विभागाला डेंग्यूच्या धोक्यावर मात करता आली नाही. डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून, आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब आहे. डेंग्यू आणि मलेरियावर मात करायची असेल तर परिसर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. पालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. डेंग्यू आणि हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पुरेपूर काळजी घेत असल्याचे बुलडाणा जिल्हा हिवताप अधिकारी एस.के.वानखेड यांनी सांगीतले.डेंग्यूसदृश्य रूग्ण वर्ष               संशयित रुग्ण                मृत्यू२0१0             १४८९                          0५२0११             ११३८                          २५२0१२             २४२२                          ७३२0१३             ५४३२                          ४८२0१४             ३५00                          २४