संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. या विहिरींच्या कामांसाठी कुशल आणि अकुशल मजुरीवर १७५ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे करण्यात येतात. सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंंत शासनाकडून अनुदान दिले जाते. गत एप्रिल ते ९ जुलै २0१५ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच सद्यस्थितीत राज्यात ७३ हजार २९0 सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. ९ जुलैपर्यंत राज्यात पूर्ण करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांच्या मजुरीवर १७५ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामध्ये अकुशल कामांच्या मजुरीपोटी ९९ कोटी ६३ लाख आणि कुशल कामांच्या मजुरीपोटी ७६ कोटी २ लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. मजुरीची वितरित करण्यात आलेली रक्कम संबंधित कामांवरील मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
विहिरी कामांच्या मजुरीवर खर्च करण्यात आलेला निधी
कामाचा प्रकार निधी
कुशल कामे ७६.0२ कोटी
अकुशल कामे ९९.६३ कोटी ...
एकूण १७५.६५
नरेगा अंतर्गत राज्यात एप्रिल ते ९ जुलै २0१५ या कालावधीत १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. ७३ हजार ८२ सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांवर अकुशल व कुशल कामांच्या मजुरीवर १७५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे नरेगाचे राज्य आयुक्त मुथुकृष्णन संकरनारायणन यांनी स्पष्ट केले.