शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

१७ अभियंत्यांना काढले; जिल्ह्यातील कामे अधांतरी

By admin | Updated: June 6, 2015 01:39 IST

राजीव गांधी पंचायत राज अभियान; योजनेचा निधी बंद.

संतोष येलकर/ अकोला : राजीव गांधी पंचायत राज अभियान केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्यातून वगळण्यात आली आहे. योजना निधीतून बाद करण्यात आल्याने, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायती अंतर्गत कार्यरत कंत्राटी १७ अभियंत्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांनी ३0 मे रोजी दिला. अभियंत्यांना सेवेतून काढण्यात आल्याने, राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यातील विकासकामे अधांतरी अडकली आहेत. राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियान (आरजीपीएसए) ही योजना राज्यात राबविण्यास ३ मार्च २0१४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर कंत्राटी तत्त्वावर गटअभियंता आणि पंचायत अभियंत्यासह कर्मचार्‍यांची पदे भरण्यात आली होती. सन २0१४-१५ या वर्षासाठी अकोला जिल्हा परिषद अंतर्गत एकूण २0 कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये पाच गटअभियंता, १२ पंचायत अभियंते आणि एक लेखापाल, एक लिपिक व एक परिचर या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यानंतर सन २0१५-१६ या वर्षापासून राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियान केंद्र शासनाच्या आर्थिक साहाय्यातून वगळण्याचा निर्णय २८ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने घेतला. योजना निधीतून वगळण्यात आल्याने, जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या १७ कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून काढण्यात आले. त्यामध्ये पाच गटअभियंता आणि १२ पंचायत अभियंत्यांचा समावेश आहे. एकूण १७ अभियंत्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ३0 मे रोजी दिला. कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून काढण्यात आल्याने, केंद्र व राज्य शासनासह जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकासकामे ठप्प झाली आहेत. अभियंत्यांअभावी अडकलेली ही विकासकामे कशी मार्गी लागतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.