शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

१७ अभियंत्यांना काढले; जिल्ह्यातील कामे अधांतरी

By admin | Updated: June 6, 2015 01:39 IST

राजीव गांधी पंचायत राज अभियान; योजनेचा निधी बंद.

संतोष येलकर/ अकोला : राजीव गांधी पंचायत राज अभियान केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्यातून वगळण्यात आली आहे. योजना निधीतून बाद करण्यात आल्याने, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायती अंतर्गत कार्यरत कंत्राटी १७ अभियंत्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांनी ३0 मे रोजी दिला. अभियंत्यांना सेवेतून काढण्यात आल्याने, राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यातील विकासकामे अधांतरी अडकली आहेत. राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियान (आरजीपीएसए) ही योजना राज्यात राबविण्यास ३ मार्च २0१४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर कंत्राटी तत्त्वावर गटअभियंता आणि पंचायत अभियंत्यासह कर्मचार्‍यांची पदे भरण्यात आली होती. सन २0१४-१५ या वर्षासाठी अकोला जिल्हा परिषद अंतर्गत एकूण २0 कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये पाच गटअभियंता, १२ पंचायत अभियंते आणि एक लेखापाल, एक लिपिक व एक परिचर या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यानंतर सन २0१५-१६ या वर्षापासून राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियान केंद्र शासनाच्या आर्थिक साहाय्यातून वगळण्याचा निर्णय २८ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने घेतला. योजना निधीतून वगळण्यात आल्याने, जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या १७ कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून काढण्यात आले. त्यामध्ये पाच गटअभियंता आणि १२ पंचायत अभियंत्यांचा समावेश आहे. एकूण १७ अभियंत्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ३0 मे रोजी दिला. कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून काढण्यात आल्याने, केंद्र व राज्य शासनासह जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकासकामे ठप्प झाली आहेत. अभियंत्यांअभावी अडकलेली ही विकासकामे कशी मार्गी लागतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.