शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

विहिरींचे अखर्चित १७ कोटी परत जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 09:27 IST

शासनाने मागितलेल्या हिशेबात उघड झाला अखर्चित निधी

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांमध्ये सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाचा गेल्या पाच वर्षात पुरता बोजवारा उडाला आहे. शेतकर्‍यांच्या विहिरींसाठी मिळालेला १७ कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्चच झालेला नाही. त्यातून विहिरींची निर्मितीच झाली नसताना आता हा निधी शासनाने जिल्हा परिषदेला मागितलेल्या हिशेबानंतर परत जाण्याची चिन्हे आहेत. शासनाची आर्थिक अडचण शेतकर्‍यांच्या विहिरींचा निधी परत घेऊन सोडवली जाते की काय, अशीच शक्यता निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याने शासनाची आर्थिक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी खर्चात कपातीचे धोरण राबवत शासनाचा निधी परत बोलावण्याची तयारी झाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ३0 जून २0१७ पर्यंत अखर्चित असलेला निधी परत घेतला जात आहे. त्या निधीची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्यानंतर त्याची पडताळणी स्थानिक लेखा विभाग करत आहे. अकोला जिल्हा परिषदेतील काही विभागाकडे असलेल्या निधीचे आकडे पुढे येत आहेत. त्यामध्ये लघुसिंचन विभागाकडे देण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरींचा निधी १७ कोटींपेक्षाही अधिक आहे. शासनाने विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांमध्ये सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम २00९-१0 मध्ये सुरू केला. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात १ हजार विहिरींचे उद्दिष्टही देण्यात आले; मात्र अनेक कारणांमुळे त्या विहिरींची सुरुवातच झाली नाही. ज्या शेतकर्‍यांनी सुरू केल्या, त्यांच्या विहिरी अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. पूर्ण झालेल्या विहिरींना शंभर टक्के निधी वाटप झाला नाही. त्यामुळे गेल्या २0१0-११ पासून प्राप्त झालेल्या निधीतून कोट्यवधी अखर्चित आहेत. त्यावेळी जिल्हय़ातील सिंचन विहिरींसाठी प्राप्त असलेला १७ कोटी ८७ लाख आणि १ कोटी २२ लाख रुपये आताही अखर्चित आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी अखर्चित असताना शेतकर्‍यांच्या विहिरींची अवस्था काय असणार, ही बाब आता शोधाची झाली आहे.