शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

१६ लाखांच्या दरोड्याचे बिंग आलिशान जिप्सीमुळे फुटले!

By admin | Updated: July 13, 2017 01:08 IST

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये एका व्यापाऱ्याची बॅग लुटून तब्बल १६ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली होती...

सचिन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी बगीच्याजवळ २०१५ मध्ये एका व्यापाऱ्याची बॅग लुटून तब्बल १६ लाख रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली होती. दोन वर्षांपासून प्रकरण शांत असताना, एका आलिशान जिप्सीवरून रोकड पळविणाऱ्यांमध्येच चर्चा झाली अन् या प्रकरणाचे बिंग फुटले. जुने शहरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.सरकारी बगीच्याजवळून जात असताना व्यापाऱ्याची एका टोळक्याने १६ लाख रुपयांची बॅग पळविली होती. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, शोध लागला नाही. या लुटमारीनंतर १६ लाख रुपयांची हिस्सेवाटणी करण्यात आली. या टोळीतील म्होरक्याने त्याच्या साथिदारांना बॅगमध्ये केवळ आठ लाखच असल्याचे सांगत, आधीच आठ लाख रुपयांवर डल्ला मारून घेतला. त्यानंतर उर्वरित आठ लाखांमधील दीड लाख एका खास साथीदाराला दिले, तर उर्वरित ५० हजारांप्रमाणे अन्य साथीदारांना वाटप केले. या वाटपानंतर प्रकरण शांत झाले; मात्र टोळीच्या म्होरक्याने काही महिन्यातच वेगळी जिप्सी कार खरेदी केली आणि यातच त्याच्या साथीदारांच्या भुवया उंचावल्या. टोळीचा म्होरक्या वगळता अन्य साथीदार एका बारमध्ये बसल्यानंतर हा प्रकार जोरात बोलल्या गेला, त्यानंतर सदर प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांना हा प्रकार माहिती होताच टोळीचा म्होरक्या आणि दीड लाखांची रक्कम घेणारा साथीदार दोघांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी सुरू असतानाच काही मोठे नावे समोर येणार असल्याचा संशय व्यक्त करण््यात येत आहे. ‘बाजीराव’ने तीन तास धुलाई!दोघांमधील एक पहीलवान असल्याने त्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन ते तीन तास धुलाई केल्याची माहिती आहे. यामध्ये ताब्यात घेतलेल्या युवकाने अचानकच डोळे बंद केले. त्यामुळे मरणासन्न अवस्थेतच त्याला पोलिसांनी खुल्या जागेत टाकले. बरेच वेळ हालचाल न झाल्याने पोलिसांमध्ये चर्चा सुरू झाली. मात्र, दोन तासांनंतर हा युवक उठल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.तक्रार तीन लाखांचीव्यापाऱ्याच्या बॅगमधून तब्बल १६ लाख पळविल्या गेले. मात्र म्होरक्याने ही रक्कम केवळ आठ लाख दाखविली. तर पोलीसात दाखल असलेल्या तक्रारीत केवळ ३ लाख १५ हजार चोरी गेल्याचे नमूद आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम कमी करण्यामागे काय गोडबंगाल आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.