शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

१५0 दिव्यांगांना दिले जगण्याचे बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:54 IST

अकोला : जन्मत: आणि अपघाती नशिबी आलेल्या विदर्भातील दिव्यांगांना समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम गत तीन वर्षांपासून अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यंदाही विदर्भातील १५0 दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न महावीर सेवा सदन आणि रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या दिव्यांगांना कृत्रिम-हात पाय देण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देमहावीर सेवा सदनरोटरी मिडटाउनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जन्मत: आणि अपघाती नशिबी आलेल्या विदर्भातील दिव्यांगांना समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम गत तीन वर्षांपासून अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यंदाही विदर्भातील १५0 दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न महावीर सेवा सदन आणि रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या दिव्यांगांना कृत्रिम-हात पाय देण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.सलग तीन वर्षांपासून अकोल्यात हा प्रयोग सुरू असून, विदर्भातील दिव्यांग या शिबिराचा लाभ घेत आहेत. यंदाही हे शिबिर अकोल्यातील दगडीपुलाजवळच्या ओसवाल भवनात १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आले. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा,जळगाव, बल्लारशहा, वाशिम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास १५0 दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेतला. दूर-दुरून येऊन दिव्यांगांनी येथून कृत्रिम हातपाय बसवून घेतले. यावेळी दिव्यांगांच्या चेहर्‍यावरील हास्य सामाजिक कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा देणारे ठरले. गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याच्या या उपक्रमात नवल जैन, प्रकाश लोढिया, गिरीष राठी, राहुल गोसर, राजेश बिलाला, श्याम ठाकूर, रश्मी शहा, राजेश अग्रवाल, दीपेश शहा, आनंद चांडक, राजू बजाज, वैभव शहा, प्रशांत झांबड, मनोज खंडेलवाल, समीर शहा, हेमंत कटारिया, सुनील जांगीड, राजेश पटवारी, विक्रम गोलेच्छा, प्रशांत मानधणे सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

विष्णूला मिळाला पाय!बल्लारशहा येथील तीन वर्षीय विष्णू संतने एका रेल्वे अपघातात पाय गमाविला होता. आईशिवाय जगण्याचा कोणताही आधार नसलेल्या विष्णूला या शिबिरात कृत्रिम पाय दिला गेला. मोलमजुरी करून दिनचर्या चालविणार्‍या या मध्यमवर्गीय मायलेकांना कृत्रिम पायाने जगण्याचे बळ दिले आहे.

रोहितही चालत गेला..!तेल्हारा येथील सहाव्या वर्गातील रोहित गणेश काकडे या चिमुकल्याने बोन कॅन्सरने पाय गमाविला होता. उपचाराअंती तो आता चांगला झाला. मात्र, त्याच्या पायाला जुळेल, असे कृत्रिम पाय मिळाले नव्हते. मात्र, अकोल्याच्या या शिबिरात रोहितही गावाकडे सर्वसामान्य मुलासारखा चालत गेला.-