शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पंढरपूर यात्रेसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या धावणार!

By admin | Updated: June 24, 2017 13:25 IST

पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या सोडल्या जाणार .

मागील वर्षी केल्या ४६७ फेर्‍या; ६0 लाखांचे उत्पन्न

अकोला : पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी दिली आहे. ३0 जून ते १0 जुलै १७ च्या कालावधीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा भरते. त्यानिमित्ताने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसगाड्या दरवर्षी सोडल्या जातात. अकोला विभागातूनही या यात्रेनिमित्त नियोजन करण्यात आले आहे. अकोला -वाशिम या दोन्ही जिल्हय़ातून १५0 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला आगार (१) -१४, अकोला आगार (२) - ३३, अकोट -१३ , कारंजा -१२, मंगरूळपीर -११, वाशिम -३0, रिसोड २१, तेल्हारा-१0, मूर्तिजापूर-६ बसगाड्या धावणार आहेत, तसेच ५0 प्रवासी गटाची मागणी असल्यास त्या ठिकाणाहून राज्य परिवहन मंडळ स्वतंत्र सेवा देणार आहे. ग्रामीण प्रवाशांचा गटही त्यात सहभागी होऊ शकतो, असे असल्यास त्यांनी आगार प्रमुखांशी संपर्क साधावा. परतीच्या प्रवासासाठी आरक्षणाची व्यवस्थाही आगारात केली आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला विभाग नियंत्रकाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षी अकोला विभागाने ४६७ फेर्‍या चालवून एकूण ६0.९७ लाखांचे उत्पन्न मिळविले होते. ४५९८६ प्रवाशांनी याचा लाभ मागील वर्षी घेतला होता.