शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवभाेजनाने भागवली १.४८ लाख नागरिकांची भूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली होती. तेव्हापासून ते ...

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली होती. तेव्हापासून ते ३१ मे पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार झाला.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध सुरू झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रोजंदारीने कामावर जाणारे, गोरगरीब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यातीलच एक. त्या आधी शिवभोजन थाळी ही पाच रुपये दराने उपलब्ध होत होती. निर्बंधांच्या कालावधीत हीच थाळी शासनाने विनामूल्य तसेच शक्य तिथे पार्सल सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील १३ शिवभोजन थाळी केंद्रांवरून जिल्हाभरात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले.

आधी माफक दर, आता माेफत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी ही योजना २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपये दराने भोजन दिले जाते. मात्र, नंतर कोरोना कालावधीत शासनाने हे दर पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे केले. कडक निर्बंधांच्या कालावधीत थाळ्यांचे मोफत वितरण झाले. शहरी भागात आपल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना ठरली आहे.

असे मिळते जेवण

शिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात आणि १०० ग्रॅमचे एक वाटी वरण इतके भोजन देण्यात येते.

जिल्ह्यात एकूण केंद्रे १३

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या मुख्यालयी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहर व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी तीन ठिकाणी, मूर्तिजापूर व तेल्हारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी, तर अकोट, बाळापूर, पातूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १३ ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. आताही निर्बंध शिथिल झाले असले तरी लोक या थाळीचा लाभ घेऊन आपली भूक शमवीत आहेत.