शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जलयुक्तसाठी जिल्ह्यातील १४४ गावांची होणार निवड

By admin | Updated: May 1, 2017 03:16 IST

विभागात १,०४१ गावे : विभागीय समन्वय समितीचा निर्णय

अकोला: जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आराखड्याला मान्यता देणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीने पाच जिल्ह्यातून १,०४१ गावांची निवड करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात १४४ गावांची निवड केली जाणार आहे. शासनाने जलयुक्त शिवारच्या प्रभावी अंमलबजावणी आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित केली आहे. ही समिती आराखड्यास मान्यता देऊन कामांचा अहवाल शासनाला सादर करते. अमरावती विभागीय समितीची बैठक २४ एप्रिल रोजी पार पडली. या समितीने विभागातील पाचही जिल्ह्यातील गावांची संख्या निश्चित केली. २०१७-२०१८ मध्ये या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे केली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात म्हणजे २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातून निवड झालेल्या गावांचे उद्दिष्ट वजा करून नवे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. शिल्लक असलेल्या गावांपैकी केवळ २१ टक्केच गावांची निवड करण्यात आली. सात दिवसात अंतिम यादीविभागीय समितीने गाव निवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने सात दिवसांत गावांची अंतिम यादी निश्चित करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील गावांची निवड लवकरच होणार आहे. ७५ टक्के गावे अद्यापही शिल्लकजलयुक्त शिवार अभियानात गेल्या दोन वर्षात सर्वच जिल्ह्यात निवड आणि कामे झालेल्या जिल्ह्याची संख्या केवळ २५ टक्के आहे. चालू वर्षात एकूण ७५ टक्के गावांमध्ये कामे होण्याची प्रतीक्षा आहे. त्यापैकी २१ टक्के गावांची निवड करण्यात आली आहे. अद्यापही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गावे शिल्लक राहणार आहेत. --