शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जलयुक्तसाठी जिल्ह्यातील १४४ गावांची होणार निवड

By admin | Updated: May 1, 2017 03:16 IST

विभागात १,०४१ गावे : विभागीय समन्वय समितीचा निर्णय

अकोला: जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आराखड्याला मान्यता देणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीने पाच जिल्ह्यातून १,०४१ गावांची निवड करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात १४४ गावांची निवड केली जाणार आहे. शासनाने जलयुक्त शिवारच्या प्रभावी अंमलबजावणी आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित केली आहे. ही समिती आराखड्यास मान्यता देऊन कामांचा अहवाल शासनाला सादर करते. अमरावती विभागीय समितीची बैठक २४ एप्रिल रोजी पार पडली. या समितीने विभागातील पाचही जिल्ह्यातील गावांची संख्या निश्चित केली. २०१७-२०१८ मध्ये या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे केली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात म्हणजे २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातून निवड झालेल्या गावांचे उद्दिष्ट वजा करून नवे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. शिल्लक असलेल्या गावांपैकी केवळ २१ टक्केच गावांची निवड करण्यात आली. सात दिवसात अंतिम यादीविभागीय समितीने गाव निवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने सात दिवसांत गावांची अंतिम यादी निश्चित करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील गावांची निवड लवकरच होणार आहे. ७५ टक्के गावे अद्यापही शिल्लकजलयुक्त शिवार अभियानात गेल्या दोन वर्षात सर्वच जिल्ह्यात निवड आणि कामे झालेल्या जिल्ह्याची संख्या केवळ २५ टक्के आहे. चालू वर्षात एकूण ७५ टक्के गावांमध्ये कामे होण्याची प्रतीक्षा आहे. त्यापैकी २१ टक्के गावांची निवड करण्यात आली आहे. अद्यापही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गावे शिल्लक राहणार आहेत. --