शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
7
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
8
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
9
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
10
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
11
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
12
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
13
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
14
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
15
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
16
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
17
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
18
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
19
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
20
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

विकासकामांसाठी मंजूर १३ कोटींचा निधी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : विकासकामांच्या थकीत देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : विकासकामांच्या थकीत देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आलेल्या तत्कालिन शासन निर्णयावर काँग्रेस व शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने राज्य शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, यासाठी काँग्रेस, सेना आग्रही आहेत.

सप्टेंबर २०१६मध्ये तत्कालिन भाजप सरकारने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करत शहरालगतच्या १३ मुख्य ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपामध्ये समावेश केला होता. त्यानंतर या भागातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात मनपाला २० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. एकूणच शासनाकडून प्राप्त निधीतून दर्जेदार रस्ते, नाले, पथदिव्यांची सुविधा, जलवाहिनीचे जाळे, खुल्या जागांचे सौंदर्यीकरण आदी विविध विकासकामे करणे अपेक्षित होते. मनपाने यामधून ५५२ विकासकामांपैकी ३१८ कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. या बदल्यात कंत्राटदारांना आजवर ४२ कोटी ८२ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याची माहिती आहे तर उर्वरित कामे अर्धवट स्थितीत आहेत. यादरम्यान शासनाकडून ४६ कोटी ७६ लाखांचा निधी मिळणे बाकी आहे. हा निधी महापालिकेला प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. तरीही सत्ताधारी भाजपच्या संमतीने चौदाव्या वित्त आयोगातून मनपाचा १३ कोटींचा आर्थिक हिस्सा वळता करण्याचा प्रस्ताव दिनांक २ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मनपातील विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

शासन निर्णयावर आक्षेप

विकासकामांच्या थकीत देयकांसाठी मनपाच्या १४ व्या वित्त आयोगातून निधी वर्ग करता येतो, असा तत्कालिन राज्य शासनाच्या काळातील शासन निर्णय असून, या निर्णयावर अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. यासंदर्भात मनपाने शासनाचे मार्गदर्शन घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन घेतले नाही, हे विशेष.

२ जुलैच्या सभेतील अनेक ठराव विखंडित

शिवसेनेच्या प्राप्त तक्रारीवरून राज्य शासनाने २ जुलै रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील अनेक ठराव विखंडित केले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगातून वळता केलेल्या निधीच्या ठरावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटींचा निधी मंजूर केला असताना, १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटी रुपये वर्ग करण्याची घाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्र दिले असून, आयुक्तांच्या अडचणीत वाढ होईल, हे निश्चित. - राजेश मिश्रा, गटनेता, शिवसेना