शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विकासकामांसाठी मंजूर १३ कोटींचा निधी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : विकासकामांच्या थकीत देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : विकासकामांच्या थकीत देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आलेल्या तत्कालिन शासन निर्णयावर काँग्रेस व शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने राज्य शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, यासाठी काँग्रेस, सेना आग्रही आहेत.

सप्टेंबर २०१६मध्ये तत्कालिन भाजप सरकारने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करत शहरालगतच्या १३ मुख्य ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपामध्ये समावेश केला होता. त्यानंतर या भागातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात मनपाला २० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. एकूणच शासनाकडून प्राप्त निधीतून दर्जेदार रस्ते, नाले, पथदिव्यांची सुविधा, जलवाहिनीचे जाळे, खुल्या जागांचे सौंदर्यीकरण आदी विविध विकासकामे करणे अपेक्षित होते. मनपाने यामधून ५५२ विकासकामांपैकी ३१८ कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. या बदल्यात कंत्राटदारांना आजवर ४२ कोटी ८२ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याची माहिती आहे तर उर्वरित कामे अर्धवट स्थितीत आहेत. यादरम्यान शासनाकडून ४६ कोटी ७६ लाखांचा निधी मिळणे बाकी आहे. हा निधी महापालिकेला प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. तरीही सत्ताधारी भाजपच्या संमतीने चौदाव्या वित्त आयोगातून मनपाचा १३ कोटींचा आर्थिक हिस्सा वळता करण्याचा प्रस्ताव दिनांक २ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मनपातील विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

शासन निर्णयावर आक्षेप

विकासकामांच्या थकीत देयकांसाठी मनपाच्या १४ व्या वित्त आयोगातून निधी वर्ग करता येतो, असा तत्कालिन राज्य शासनाच्या काळातील शासन निर्णय असून, या निर्णयावर अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. यासंदर्भात मनपाने शासनाचे मार्गदर्शन घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन घेतले नाही, हे विशेष.

२ जुलैच्या सभेतील अनेक ठराव विखंडित

शिवसेनेच्या प्राप्त तक्रारीवरून राज्य शासनाने २ जुलै रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील अनेक ठराव विखंडित केले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगातून वळता केलेल्या निधीच्या ठरावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटींचा निधी मंजूर केला असताना, १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटी रुपये वर्ग करण्याची घाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्र दिले असून, आयुक्तांच्या अडचणीत वाढ होईल, हे निश्चित. - राजेश मिश्रा, गटनेता, शिवसेना