शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

विकासकामांसाठी मंजूर १३ कोटींचा निधी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : विकासकामांच्या थकीत देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : विकासकामांच्या थकीत देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आलेल्या तत्कालिन शासन निर्णयावर काँग्रेस व शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने राज्य शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, यासाठी काँग्रेस, सेना आग्रही आहेत.

सप्टेंबर २०१६मध्ये तत्कालिन भाजप सरकारने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करत शहरालगतच्या १३ मुख्य ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपामध्ये समावेश केला होता. त्यानंतर या भागातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात मनपाला २० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. एकूणच शासनाकडून प्राप्त निधीतून दर्जेदार रस्ते, नाले, पथदिव्यांची सुविधा, जलवाहिनीचे जाळे, खुल्या जागांचे सौंदर्यीकरण आदी विविध विकासकामे करणे अपेक्षित होते. मनपाने यामधून ५५२ विकासकामांपैकी ३१८ कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. या बदल्यात कंत्राटदारांना आजवर ४२ कोटी ८२ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याची माहिती आहे तर उर्वरित कामे अर्धवट स्थितीत आहेत. यादरम्यान शासनाकडून ४६ कोटी ७६ लाखांचा निधी मिळणे बाकी आहे. हा निधी महापालिकेला प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. तरीही सत्ताधारी भाजपच्या संमतीने चौदाव्या वित्त आयोगातून मनपाचा १३ कोटींचा आर्थिक हिस्सा वळता करण्याचा प्रस्ताव दिनांक २ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मनपातील विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

शासन निर्णयावर आक्षेप

विकासकामांच्या थकीत देयकांसाठी मनपाच्या १४ व्या वित्त आयोगातून निधी वर्ग करता येतो, असा तत्कालिन राज्य शासनाच्या काळातील शासन निर्णय असून, या निर्णयावर अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. यासंदर्भात मनपाने शासनाचे मार्गदर्शन घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, आजपर्यंत प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन घेतले नाही, हे विशेष.

२ जुलैच्या सभेतील अनेक ठराव विखंडित

शिवसेनेच्या प्राप्त तक्रारीवरून राज्य शासनाने २ जुलै रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील अनेक ठराव विखंडित केले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगातून वळता केलेल्या निधीच्या ठरावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामांसाठी शासनाने ९६ कोटींचा निधी मंजूर केला असताना, १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटी रुपये वर्ग करण्याची घाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्र दिले असून, आयुक्तांच्या अडचणीत वाढ होईल, हे निश्चित. - राजेश मिश्रा, गटनेता, शिवसेना