नितीन गव्हाळे/ अकोला: शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन दोन वर्षे उलटली, तरी अमरावती विभागामध्ये अद्यापही शाळाबाहय़ मुले दिसून येतात. जानेवारी महिन्यात शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांमध्ये १२४९ शाळाबाहय़ मुले दिसून आली; परंतु त्यापैकी शेकडो मुले शिक्षणापासून वंचित असल्याची वस्तुस्थिती आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, गलिच्छ वस्ती आदी परिसरामध्ये शेकडो मुले-मुली भीक मागताना; चहाटपरी, दुकानांवर मजुरी करताना दिसून येतात. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ६ ते १४ वयोगटातील शाळाबाहय़ मुलांचा शोध घेऊन, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जानेवारी महिन्यात शिक्षण विभागाच्या वतीने सामाजिक संघटनांची मदत घेऊन बसस्थानक, रेल्वेस्थानक, गलिच्छ वस्ती परिसरात सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांमध्ये १२४९ मुले-मुली सापडल्या; त्यापैकी पाचशे-सहाशे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले. उर्वरित मुले अद्यापही शिक्षणापासून दूर असल्याची वस्तुस्थिती आहे. शाळाबाहय़ मुलांचा शोध घेऊनही उपयोग होत नाही. शाळाबाहय़ मुलांची संख्या कागदावरच असल्याने, प्रत्यक्ष ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहतात. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरतीच होत असल्याचे स्पष्ट होते. अमरावती विभागातील शाळाबाहय़ मुलेजिल्हा मुले मुलीअकोला- ८७ ८९अमरावती- १२९ १३८वाशिम- १२७ ११६बुलडाणा- १३२ १२१यवतमाळ- १५९ १५१......................एकूण- ६३४ ६१५
अमरावती विभागात १२४९ शाळाबाहय़ मुले!
By admin | Updated: February 6, 2016 00:14 IST