शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

१२ पूल धोकादायक!

By admin | Updated: August 4, 2016 01:48 IST

कामे प्रलंबित; नागरिकांची गैरसोय; अपघाताच्या घटनांना निमंत्रण.

संतोष येलकर अकोला, दि. ३- जिल्हय़ातील प्रमुख जिल्हामार्ग आणि राज्य मार्गावरील अनेक ठिकाणच्या पुलांची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पूल शिकस्त झाले असून, पुलांची रुंदी कमी आहे. बहुतांश पुलांवर कठडे नाहीत. अतवृष्टी आणि नदी-नाल्यांना पूर आल्यास कमी उंची आणि अरुंद असलेल्या पुलांवरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने, नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्हय़ात प्रमुख जिल्हामार्ग आणि राज्य मार्गावरील १२ पुलांची अवस्था धोकादायक आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना पूर आल्यास या कमकुवत पुलांवरील वाहतूक विस्कळीत होते. तसेच अरुंद पूल आणि कठडे नसल्याने वाहनधारक आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊनच पूर पार करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील धोकायदायक पूल अपघाताच्या प्रसंगांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. नागरिकांसाठी गैरसोयीचे आणि जीवघेण्या ठरणार्‍या पुलांच्या ठिकाणी नवीन पुलांची कामे मात्र रखडली आहेत.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे माहितीच नाही! जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हय़ातील ग्रामीण भागात रस्त्यांवर असलेले काही पूलदेखील शिकस्त झाले आहेत. त्यानुषंगाने धोकादायक असलेल्या पुलांसंबंधी माहितीसाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता, धोकादायक पुलांसंबंधी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यासोबत संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.पाच पुलांच्या कामांची निविदा प्रक्रिया; तीन पुलांच्या कामांना मंजुरी बाकी!जिल्हा मार्ग अंतर्गत उमरी-गुडधी-सांगळूद, वणी-कानशिवणी, म्हसांग-रामगाव-दहिगाव, हिंगणा-गोरेगाव-माझोड व भटोरी-मंगरुळ कांबे या पाच रस्त्यांवर नवीन पाच पुलांची कामे मंजूर असून, या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर राज्य मार्गावरील हातरुण-निमकर्दा, पातुर्डा-उकळी-निंभोरा व आंबेटाकळी -बाश्रीटाकळी या तीन रस्त्यांवरील नवीन तीन पुलांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांसाठी शासनामार्फत मंजुरी प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.असे आहेत मार्गनिहाय रस्त्यांवरील धोकादायक पूल!जिल्हय़ात राज्य मार्गावरील आकोट -अकोला, म्हैसांग-आसरा, आकोट -हिवरखेड, शेगाव-देवरी, हातरुण-निमकर्दा, पातुर्डा-उकळी-निंभोरा, आंबेटाकळी-बाश्रीटाकळी तसेच जिल्हा मार्गावरील उमरी -गुडधी-सांगळूद, वणी-कानशिवणी, म्हैसांग-रामगाव-दहिगाव, हिंगणा-गोरेगाव-माझोड व भटोरी-मंगरुळ कांबे इत्यादी १२ रस्त्यावरील १२ पुलांची अवस्था धोकादायक आहे.