लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : पाण्याच्या शोधात भटकत असलेले दहा रोही कवठा सोमनाथ शिवारातील खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना १ जून रोजी घडली. विहिरीत गाळ असल्याने दहाही रोही फसले. त्यांना वाचवविण्यासाठी बचाव पथकाचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. कवठा सोमनाथ शेतशिवारात दहा रोही पाण्याच्या शोध घेत फिरत होते. मंगेश वानखडे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू आहे. अर्धवट खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत दहाही रोही कोसळले. चिखलमाती असल्याने रोहींना बाहेर येता येत नव्हते. याविषयी माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन बचाव मोहीम सुरू केली.
१० रोही विहिरीत फसले!
By admin | Updated: June 2, 2017 03:04 IST