शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींच्या वारसांना १० लाखांची मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:26 IST

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यात यावर्षी पुरात वाहून गेल्याने व वीज पडून नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील पाच व्यक्तींच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. उपलब्ध मदतीची रक्कम तहसीलदारांमार्फत संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे.राज्यात २०१९ मध्ये पूर, चक्रीवादळ आणि वीज पडून इत्यादी नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात यावर्षी नैसगिक आपत्तीने मृत्यू झालेल्या बाळू नारायण उमाळे, कपिल दीपक शेगोकार, महेंद्र रामकृष्ण वानखडे, प्रशांत बाळकृष्ण गवारगुरू व अभिजित श्रीकृष्ण इंगळे इत्यादी पाच व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयेप्रमाणे १० लाख रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आली आहे. १० लाख रुपये मदतीची रक्कम ९ डिसेंबर रोजी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम १० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयेप्रमाणे मदतीच्या रकमेचे धनादेश तहसीलदारांमार्फत देण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोला