शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

देशात १ कोटी ६८ लाख कापूस गाठींची आवक!

By admin | Updated: February 3, 2017 19:33 IST

सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर ; कापसाचा वेचणी हंगाम अंतिम टप्प्यात!

अकोला, दि. ३- कापूस वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी कापसाचे दरही समाधानकारक असल्याने बाजारात कापसाची आवक १ कोटी ६८ लाख गाठी एवढी वाढली आहे. दरम्यान, कापसाचे दर वाढण्याची शक्यता कापूस उद्योजकांनीच वर्तविली आहे.यावर्षी राज्यात ३२ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे; पण कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात यवतमाळ जिल्हा वगळता कापूस पेरणी घटली आहे. पाऊस मात्र समाधानकारक झाल्याचे कापसाच्या उत्पादनात वाढ झाली असून, एकरी सरासरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा लागला आहे. तसेच दरही प्रतिक्विंटल ५,८00 ते ६ हजार रुपयापर्यंत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. एरवी कापसाला पूरक दर मिळत नसल्याने दर वाढतील या प्रतीक्षेत शेतकरी कापूस साठवून ठेवत होता; पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कापसाची बाजारात चांगली आवक आहे.कापसाची होणारी निर्यात, देशांतर्गत वाढलेली कापसाची मागणी तसेच सरकीचे दर वाढल्याने कापसाच्या दरात तेजी आली आहे. मागील दहा वर्षात यावर्षी वाढलेले कापसाचे दर हे सर्वाधिक आहेत. पावसाची अनिश्‍चितता आणि उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारे दर बघता या खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी कपाशीची पेरणी कमी करू न सोयाबीन पेरणी केली; परंतु मध्ये पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनला ताण पडला. त्याचा परिणाम अल्प प्रमाणात उत्पादनावर झाला. असे असले तरी सोयाबीनचे उत्पादन बर्‍यापैकी झाले; परंतु हमी दरापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकर्‍यांची प्रचंड लूट झाली; परंतु कापसाने यावर्षी शेतकर्‍यांना तारले आहे.- कापसाचे दर सध्या ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, या दरात आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे. सध्या आवक वाढली असली तरी दर वाढणार असल्याने शेतकर्‍यांनी कापूस विकण्याचे टाळले आहे.बसंत बाछुकाकापूस उद्योजक,अकोला.