शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

देशात १ कोटी ६८ लाख कापूस गाठींची आवक!

By admin | Updated: February 3, 2017 19:33 IST

सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर ; कापसाचा वेचणी हंगाम अंतिम टप्प्यात!

अकोला, दि. ३- कापूस वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी कापसाचे दरही समाधानकारक असल्याने बाजारात कापसाची आवक १ कोटी ६८ लाख गाठी एवढी वाढली आहे. दरम्यान, कापसाचे दर वाढण्याची शक्यता कापूस उद्योजकांनीच वर्तविली आहे.यावर्षी राज्यात ३२ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे; पण कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात यवतमाळ जिल्हा वगळता कापूस पेरणी घटली आहे. पाऊस मात्र समाधानकारक झाल्याचे कापसाच्या उत्पादनात वाढ झाली असून, एकरी सरासरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा लागला आहे. तसेच दरही प्रतिक्विंटल ५,८00 ते ६ हजार रुपयापर्यंत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. एरवी कापसाला पूरक दर मिळत नसल्याने दर वाढतील या प्रतीक्षेत शेतकरी कापूस साठवून ठेवत होता; पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कापसाची बाजारात चांगली आवक आहे.कापसाची होणारी निर्यात, देशांतर्गत वाढलेली कापसाची मागणी तसेच सरकीचे दर वाढल्याने कापसाच्या दरात तेजी आली आहे. मागील दहा वर्षात यावर्षी वाढलेले कापसाचे दर हे सर्वाधिक आहेत. पावसाची अनिश्‍चितता आणि उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारे दर बघता या खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी कपाशीची पेरणी कमी करू न सोयाबीन पेरणी केली; परंतु मध्ये पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनला ताण पडला. त्याचा परिणाम अल्प प्रमाणात उत्पादनावर झाला. असे असले तरी सोयाबीनचे उत्पादन बर्‍यापैकी झाले; परंतु हमी दरापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकर्‍यांची प्रचंड लूट झाली; परंतु कापसाने यावर्षी शेतकर्‍यांना तारले आहे.- कापसाचे दर सध्या ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, या दरात आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे. सध्या आवक वाढली असली तरी दर वाढणार असल्याने शेतकर्‍यांनी कापूस विकण्याचे टाळले आहे.बसंत बाछुकाकापूस उद्योजक,अकोला.