शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

पाचवीत असताना मी सातवीच्या वर्गाला गणित शिकवलं; आठरे, कुलकर्णी गुरूजींनी दिला विश्वास; माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 11:41 AM

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी दिलेले धडे कामी आले. त्यामुळेच खेडेगावातील एका मराठी शाळेतील विद्यार्थी दोन-दोन विद्यापीठांचा कुलगुरू होऊ शकला, अशा शब्दांत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी  शिक्षकांचा गौरव केला.

शिक्षक दिन विशेष

चंद्रकांत शेळके । 

अहमदनगर : नगर तालुक्यातील मांडवे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झालं. शाळेला इमारत  नव्हती. पत्रे  उडालेले. अशा स्थितीत आठरे गुरूजी व कुलकर्णी गुरूजी हे दोघेच सातवीपर्यंत शिकवत होते. दोघा शिक्षकांनी शिकवलेलं गणित  पुढे आयुष्यभर कामी आलं. त्या शिक्षकांमुळे एवढा आत्मविश्वास वाढला की मी पाचवीत असतानाच सहावी व सातवीतील मुलांना गणित शिकवत होतो. हीच शिदोरी घेऊन आयुष्यात गणिताचा प्राध्यापक, कुलगुरू व इतर पदे मिळवता आली. 

अभियांत्रिकीऐवजी गणितच निवडलेपुढे दहावी कोपरगावला केली. तेथे आर. जी. कोºहाळकर या शिक्षकांमुळे गणित आणखी वृद्धिंगत झाले. अकरावी पुन्हा नगरमध्ये दादा चौधरी विद्यालयात झाली. तेथे स. वि. हातवळणे सरांनी घडवले. सन १९६७ ते ७१ मध्ये नगर कॉलेजमधून बीएस्सी पूर्ण केले. खरं तर त्यावेळी अभियांत्रिकीला जाण्याची मोठी संधी होती. परंतु गणितात ंरूची असल्याने पुढे पुणे विद्यापीठात एमएस्सी (गणित) पूर्ण केले. पुणे विद्यापीठात राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षकांचा सहवास लाभला. त्यावेळी पुणे विद्यापीठात जगभरातून शिक्षकांना मागणी होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षणही जवळून पाहता आले. 

प्राध्यापक ते कुलगुरूपदवीनंतर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेत १९७५ ला गणिताचा प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. २००४मध्ये तेथेच प्राचार्यपदाची संधी मिळाली. या काळात अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठातील सर्वच अधिकार मंडळावर काम केले. या सर्वांचा परिणाम २००८-१३ स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व २०१३-१६ मध्ये लखनौ विद्यापीठात कुलगुरूपदाची संधी मिळाली. 

गावातून येऊन शहरी शाळेत नंबर...सातवीपर्यंत मांडवे गावात शिक्षण झाल्यानंतर आठवीला नगरमधील न्यू इंग्लिश स्कूलला प्रवेश घेतला. आम्हाला सातवीपर्यंत इंग्रजी नव्हतं. परंतु न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीपासूनच इंग्रजी असल्याने तेथील मुलांना इंग्रजीची ओळख होती. मला आठवीत एबीसीडीही माहीत नव्हती. परंतु तरीही माझ्या आधीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन व स्वअध्ययनामुळे आठवीत मी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. त्यातून मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. 

जीवनाला दिशा देण्यात व आपली जडणघडण करण्यात गुरूंचा वाटा महत्वाचा असतो. जगात शिक्षकांना व त्यातही भारतीय प्राध्यापकांना मानाचे स्थान आहे.     - डॉ़ सर्जेराव निमसे, माजी कुलगुरू.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र