शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

मूळा धरणातील विष प्रयोगाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 9:18 PM

मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल धरणातील पाणीसाठा शुद्ध ठेवण्यासाठी धोरण ठरणार

भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुळा धरणातील विषप्रयोग निदर्शनास आल्यानंतर राज्यातील इतरही धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये असा विषप्रयोग होऊ नये, यासाठी राज्य पातळीवरील धोरणच ठरविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीत मुळा धरण प्रकरणाची दखल घेण्यात आली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे यांच्या सूचनेवरून मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत प्रधान सचिव अनिल डिकीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. विखे यांनी बैठकीत गांभीर्याने विषय मांडतांना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील मुळा हे सर्वात मोठे धरण आहे. त्याचा २५ लाख लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात़ मुळा धरणातील मासेमारीमुळे माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ धरणात आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या मासेमारी तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज विखे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, धरणातील पाणी साठा शुध्द राहिला पाहिजे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल़ धरणातील पाणी दूषित करणे हा गंभीर गुन्हा आहे़ स्पेशल टास्क फोर्सव्दारे कारवाई केली जाईल. राज्यातही मुळा धरणाचा पॅटर्न राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.मुळा धरणात मासेमारीसाठी विषप्रयोग होत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कारवाईचा आदेश दिला होता. त्यानुसार बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून धरण परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी