शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा कृषी विभाग उरला नावाला

By admin | Updated: April 15, 2016 23:12 IST

अहमदनगर : २००१ पासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना एक एक करून कमी करण्याचा धडका राज्य सरकारकडून सुरू आहे.

कर्मचारी हवालदिल : सरकारकडून योजना कपातीचा धडाकाअहमदनगर : २००१ पासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना एक एक करून कमी करण्याचा धडका राज्य सरकारकडून सुरू आहे. यामुळे एकेकाळी खरीप, रब्बी हंगामाच्या नियोजनापासून पेरणी अहवाल तयार करणाऱ्या जि. प. च्या कृषी विभागाकडे बोटावर मोजण्याइतक्या योजना शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले असून भविष्यात आणखी योजना राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे वर्ग होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि राज्य सरकारचा कृषी विभाग असे दोन स्वतंत्र कृषी विभाग कार्यरत आहेत. या दोन्ही विभागांच्यावतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येतात. १९८३ साली जागतिक बँकेच्या सहकार्याने टी आणि व्ही (प्रशिक्षण आणि भेट) कार्यक्रम सुरू करण्यात आला. यामुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडील काही क र्मचारी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, २००१ पासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना कमी करण्याचा सपाटा सरकारने लावला. टी आणि व्ही योजनेतून एक खिडकी योजना कार्यान्वित झाली. यामुळे जिल्हा परिषदेकडील योजना कमी करण्यात येवून त्या राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेकडे हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या योजना शिल्लक राहिल्या असून यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. भविष्यात आणखी योजना कमी झाल्यास या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काय करायचे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)कृषी अधीक्षकांकडे गेलेल्या योजना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन, पीक पेरणी आणि पीक परिस्थिती अहवाल संकलन, पर्जन्यमान मापन, तुषार सिंचन योजना, केंद्र पुरस्कृत गळीत धान्य योजना, कडधान्य योजना, ऊस विकास योजना, तृणधान्य, सधन कापूस योजना, पीव्हीसी पाईप खरेदी योजना यांचा समावेश आहे. दोन वर्षांपासून सरकारकडून औजारे खरेदीचे उद्दिष्ट दिले जात नाही. जि. प. कडे शिल्लक असणाऱ्या योजना राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम, विशेष घटक योजना, आदिवासी विकास योजना, राज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजना, गुणनियंत्रण (विविध परवाने देणे) एवढे शिल्लक आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाचे ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांचे जाळे मोठे आहे. २००१ पासून हळूहळू जि.प.कडील योजना कमी झाल्या आहेत. योजना कोणी राबवयाच्या यापेक्षा त्या प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. -विलास नलगे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.