शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
5
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
6
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
7
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
8
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
9
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
10
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
11
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
12
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
13
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
14
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
15
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
16
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
17
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
18
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
19
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
20
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल

जिल्हा परिषदेचा कृषी विभाग उरला नावाला

By admin | Updated: April 15, 2016 23:12 IST

अहमदनगर : २००१ पासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना एक एक करून कमी करण्याचा धडका राज्य सरकारकडून सुरू आहे.

कर्मचारी हवालदिल : सरकारकडून योजना कपातीचा धडाकाअहमदनगर : २००१ पासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना एक एक करून कमी करण्याचा धडका राज्य सरकारकडून सुरू आहे. यामुळे एकेकाळी खरीप, रब्बी हंगामाच्या नियोजनापासून पेरणी अहवाल तयार करणाऱ्या जि. प. च्या कृषी विभागाकडे बोटावर मोजण्याइतक्या योजना शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले असून भविष्यात आणखी योजना राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे वर्ग होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि राज्य सरकारचा कृषी विभाग असे दोन स्वतंत्र कृषी विभाग कार्यरत आहेत. या दोन्ही विभागांच्यावतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येतात. १९८३ साली जागतिक बँकेच्या सहकार्याने टी आणि व्ही (प्रशिक्षण आणि भेट) कार्यक्रम सुरू करण्यात आला. यामुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडील काही क र्मचारी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, २००१ पासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना कमी करण्याचा सपाटा सरकारने लावला. टी आणि व्ही योजनेतून एक खिडकी योजना कार्यान्वित झाली. यामुळे जिल्हा परिषदेकडील योजना कमी करण्यात येवून त्या राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेकडे हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या योजना शिल्लक राहिल्या असून यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. भविष्यात आणखी योजना कमी झाल्यास या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काय करायचे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)कृषी अधीक्षकांकडे गेलेल्या योजना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन, पीक पेरणी आणि पीक परिस्थिती अहवाल संकलन, पर्जन्यमान मापन, तुषार सिंचन योजना, केंद्र पुरस्कृत गळीत धान्य योजना, कडधान्य योजना, ऊस विकास योजना, तृणधान्य, सधन कापूस योजना, पीव्हीसी पाईप खरेदी योजना यांचा समावेश आहे. दोन वर्षांपासून सरकारकडून औजारे खरेदीचे उद्दिष्ट दिले जात नाही. जि. प. कडे शिल्लक असणाऱ्या योजना राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम, विशेष घटक योजना, आदिवासी विकास योजना, राज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजना, गुणनियंत्रण (विविध परवाने देणे) एवढे शिल्लक आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाचे ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांचे जाळे मोठे आहे. २००१ पासून हळूहळू जि.प.कडील योजना कमी झाल्या आहेत. योजना कोणी राबवयाच्या यापेक्षा त्या प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. -विलास नलगे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.