शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

By admin | Updated: May 14, 2016 23:49 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी रिक्त जागांचा तपशील अपडेट नसल्याने गोंधळ झाला होता.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी रिक्त जागांचा तपशील अपडेट नसल्याने गोंधळ झाला होता. शनिवारी उपाध्यापकांच्या बदलीच्या प्रक्रियेदरम्यान मोठी गर्दी झाल्याने जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप आले होते. मुख्यालय इमारतीच्या आवारापासून इमारतीमधील प्रत्येक मजल्यावर शिक्षक बसलेले होते. यंदा ८ हजार ५०० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. यात शिक्षण विभागाने पेसा, समानीकरण, विनंती, आपसी बदल्यांच्या प्रक्रियेसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार न केल्याने एकाच वेळी सर्व शिक्षक जिल्हा परिषदेत जमा झाले. हजारो शिक्षकांच्या उपस्थितीमुळे जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत उपाध्यापकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. अतिशय संथ गतीने सुरू असणाऱ्या प्रक्रियेमुळे सायंकाळी ५ पर्यंत पेसातील बदल्या सुरू होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि अन्य अधिकारी जि. प. सभागृहात ठाण मांडून होते. शनिवारी झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत ५७ उपाध्यापक पेसातून बाहेर आले. तर सायंकाळपर्यंत ३५ शिक्षक पेसात आधी विनंतीने आणि नंतर प्रशासकीय बदलीने गेले आहेत. ही प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती. सोमवारी पदवीधर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच गाजल्या आहेत. समानीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षकांची गैरसोय झाली आहे. याबद्दल नाराजीचे वातावरण आहे.