शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
5
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
6
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
7
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
8
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
9
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
10
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
11
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
12
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
13
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
14
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
15
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
16
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
17
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
19
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
20
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

कोरोनाविषयी तरुणाई अजूनही बेफिकीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनाच्या जीवघेण्या संकटात आजच्या तरुणाईला संसर्ग होऊन मृत्यू होत आहेत तरीही याविषयी तरुणाई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोनाच्या जीवघेण्या संकटात आजच्या तरुणाईला संसर्ग होऊन मृत्यू होत आहेत तरीही याविषयी तरुणाई अजूनही बेफिकीर असल्याची खंत एका प्रसंगातून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सूर्यवंशी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रास भेट देण्यासाठी जात होते. वेळापूरनजीक रस्त्याच्या कडेला एका कारसमोर आठ-दहा तरुण गोळा झाल्याचे दिसले. बहुधा अपघात झाला असावा म्हणून मदत करण्याच्या दृष्टीने मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितले. मात्र, महाराष्ट्र शासनाचे वाहन पाहून कारसमोर जमलेले तरुण अक्षरशः सैराट धावू लागले. मी कारसमोर जाऊन उभा राहिलो. पळ काढलेल्या तरुणांकडे पाहिल्यानंतर त्यापैकी एकाच्या तोंडावर केक फासल्याने सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. कडक लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर भाईचा बर्थडे साजरा करणारे त्याचे समर्थक पाहून खूप संताप आला. मोटारसायकलला किक मारूनही ती सुरू होत नसल्याने भाईचा एक समर्थक आमच्या हाती लागला. त्यावर तुझ्या इतर मित्रांना बोलाव, नाही तर तुम्हा सगळ्यांवर गुन्हा दाखल करीन, असे म्हणताच तो हडबडून गेला. त्याने आपल्या मित्रांना फोन लावायला सुरुवात केली. मात्र, दुरून आपल्या सवंगड्याची ही फजिती पाहणाऱ्या त्याच्या इतर पळपुट्या मित्रांनी क्षणार्धात त्याचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता. अडचणीच्या काळात अशी टांग मारणाऱ्या मित्रांमुळे आता तो पुरता रडकुंडीला आला होता. गुन्हा दाखल करणार असं म्हटल्यावर त्याने गावातील इतरांची मदत मागितली. एकाने या सर्व सेलिब्रिटींना शोधून आमच्यासमोर हजर केले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपले पोलीस कर्मचारी व वाहन वेळापूरला पाठविले. पोलिसांना पाहताच आता आपल्यावर गुन्हा दाखल होणार म्हणून ही सर्व बेधुंद मंडळी एका क्षणात जमिनीवर आली. रडवेला चेहरा करून हात जोडू लागली. आमच्या भविष्याचा विचार करा. पुन्हा आयुष्यात अशी चूक करणार नाही, असे म्हणत त्यांनी लोटांगण घातले. पोलिसांसह ग्रामपंचायतीने या तरुणांवर दंडात्मक कारवाई करीत तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या, धडकी भरवणारे मृत्यूचे आकडे, कडक निर्बंध, बेड अन्‌ औषधांची अनुप्लब्धता, लसीकरणाला होणारी गर्दी यामुळे अगदी सगळ्यांचीच अक्षरशः दमछाक होत आहे. बेजबाबदारपणे वागून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी नादान तरुणाई जागोजागी आपल्यातील सार्वजनिक बेशिस्तीचे दर्शन घडवताना दिसत आहे. समाजातील सर्व घटकांच्या शिस्तबद्ध सहभागाशिवाय कोरोनाविरुद्धची ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. त्यासाठी किमान आतातरी आपण जबाबदारीने वागायला हवं. तरुणांनी तर अधिकच.