शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

लबाडाचे आवतनं ओळखल्यामुळेच तुमच्याकडचे आमच्याकडे आले : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 16:16 IST

‘फिर एक बार मोदी सरकार’ हे फक्त बारामतीच्या साहेबांच्या पहिल्यांदा लक्षात आले. त्यामुळेच कर्णधार होणारे माढामधून माघार घेत बारावे गडी झाले.

कर्जत : ‘फिर एक बार मोदी सरकार’ हे फक्त बारामतीच्या साहेबांच्या पहिल्यांदा लक्षात आले. त्यामुळेच कर्णधार होणारे माढामधून माघार घेत बारावे गडी झाले. कर्जत-जामखेडला पूर्वी साहेब आले. साहेब गेले. पण कुकडीचे काय? मग लबाडाचे आवतनं कुणाचे? हे लक्षात आल्यामुळेच तुमच्याकडचे (राष्टÑवादीतील) लोक आमच्याकडे आले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता लगावला.अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथील सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. सुरेश धस, खा. दिलीप गांधी, सभापती पुष्पा शेळके, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, अशोक खेडकर, शिवसेनेचे राजेंद्र दळवी, राजेंद्र विखे, बळीराम यादव,पप्पू शहाणे,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, राजेंद्र देशमुख,दादा सोनमाळी, प्रसाद ढोकरीकर,उमेश जेवरे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्यांचा धंदा आहे. त्यांची महाआघाडी नसून महाखिचडी आहे.पूर्वीच्या सरकारला ५० वर्षात जे करता आले नाही, ते आपल्या सरकारने पाच वर्षात देशात करून दाखविले आहे. जो निधी जिल्ह्याला येत होता, तो आपण तालुक्याला देत आहोत. त्यामुळे विकास झपाट्याने होताना दिसतो आहे. चार वर्षात २ हजार ३६४ कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. तसेच नगर जिल्ह्यात आठ हजार कोटी रूपये राष्ट्रीय महमार्गासाठी दिले. साडे सात हजार कोटी रूपये ग्राम रस्त्यांसाठी दिले. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्याचे धाडस मोदींनी दाखविले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर