शेवगाव : तीनही कृषी कायदे उद्योजकांच्या फायद्याचे आहेत. त्यामुळे कृषी कायद्याविरोधात शेतकरी व तरुणांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शेवगाव येथे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कृष्णनाथ पवार, शशीकांत कुलकर्णी, योहान मगर यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकाविण्यात आला. त्यानंतर झालेल्या बैठकीत देवढे बोलत होते. त्यावेळी भाकपचे राज्य सहसचिव ॲड. सुभाष लांडे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, पक्षाचे तालुका सचिव संजय नांगरे, प्रा. किसनराव माने, बापूराव लांडे, बबनराव पवार, अरविंद देशमुख, अशोक नजन, कारभारी वीर, वीणा भस्मे नांगरे, संग्राम मंडलिक, विश्वास हिवाळे, रत्नाकर मगर, सुरेश मगर, शेखर तिजोरे, राजू दुसंग, प्रेम अंधारे, जय बोरुडे, अवी साळुंके, नारायण पुंड, सचिन केमसे, विल्सन पवार, राहुल सावंत आदी उपस्थित होते.