शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

तुम्ही घोंगडं अंगावर टाकलं, तुमचा प्रश्न मी सोडवतो

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

गोपीनाथ मुंडे : अहिल्यादेवींच्या कारभारासारखे काम करू

जामखेड : देशात भाजपा व घटक पक्षाच सरकार सत्तेत आले आहे. अहिल्यादेवींनी जसा राज्यकारभार केला त्याचप्रमाणे आम्ही राज्य कारभार करण्याचे वचन देतो. तुम्ही सत्काररूपात घोंगडी अंगावर टाकली आहे. आता तुमचे प्रश्न माझ्या अंगावर घेतले आहेत. आरक्षण मुद्याला न्याय देऊ, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिली. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावी २८९ वी जयंती व धनगर समाजाचा मेळावा राष्टÑीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रासप अध्यक्ष महादेव जानकर, प्रदेशाध्यक्ष पुंडलिक काळे, खा.दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे, आ. राम शिंदे, आ. प्रकाश शेंडगे, आ. अनिल गोरे, आ. माधुरी मिसाळ, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुशिला मोराळे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, सुर्यकांत मोरे, प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुंडे म्हणाले, अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त मी दरवर्षी येतो. यावेळी परिवर्तन घेऊन आलो आहे. त्यामुळे मोठा जनसमुदाय आला आहे. महादेव जानकरांनी बारामतीमधून चांगली झुंज दिली. तो वाघ आहे. पडला तरी तोंड लपून बसला नाही. त्याला बारामतीला उभा करण्याचा माझा निर्णय योग्यच होता. बारामतीचा खासदार आपला आला नसला तरी आता बारामतीचा आमदार पाडायचा आहे व आपला आणायचा आहे. जानकरांना आमदार नाही तर खासदार करणार आहे, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. दिल्लीत राज्य आले आहे. राज्यात परिवर्तन होणार असल्याने तुमचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवील. महाराष्टÑ राज्याबाबत भेदभाव करणार नाही. त्यांना सांगतो तुम्ही पैसे मागा कमी पडू देणार नाही. जमिन अधिग्रहणसंबंधी कायदा संमत केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची जमिनीला चारपट भाव मिळणार आहे. आता महाराष्टÑाच्या परिवर्तनाला साथ द्या, अशी हाक मुंडे यांनी जनसमुदायाला केली. (तालुकाप्रतिनिधी)देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने देशात परिवर्तन झाले आहे. आता आॅक्टोबरमध्ये एकदा परिवर्तन करा. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्रातील सरकार एकटे काही करू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी लागते. त्यामुळे राज्यात आपलेच सरकार आणावे लागणार आहे. ४महादेव जानकर म्हणाले, मुंडे यांनी मला महायुतीत आणून माझी उंची वाढवली आहे. त्यांनी वडिलासारखे प्रेम माझ्यावर केले आहे. आता चोंडीतून रेल्वे जाईल, अशी आमची मागणी आहे. ती पूर्ण करा.