शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

चालण्याशिवाय योग, सूर्यनमस्कार आवश्यक-डॉ.सुबोध देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:17 IST

आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे ही खरी आरोग्याची चतुसूत्री आहे, असे मत मधुमेहमुक्त जीवनासाठी प्रबोधन करणारे डॉ. सुबोध देशमुख यांनी व्यक्त केले.

जागतिक मधुमेह नियंत्रण दिन विशेष / अहमदनगर : मधुमेहमुक्त जीवन जगायचे असेल तर जीवनात आरोग्याची चतुसूत्री आवश्यक आहे. आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे ही खरी आरोग्याची चतुसूत्री आहे, असे मत मधुमेहमुक्त जीवनासाठी प्रबोधन करणारे डॉ. सुबोध देशमुख यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, योग्य आहार, आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळीचे पदार्थ, फळभाज्या, सलाड यांचा समावेश करणे गरजेचे आहे.  चालणे गरजेचे आहे. मात्र केवळ चालणे म्हणजे व्यायाम नाही. अनेक जण चालण्याला व्यायाम समजतात. चालण्याशिवाय नित्य जीवनात योगासने, सूर्यनमस्कार, गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम (उदा. जिने चढणे) आदींचा समावेश गरजेचा आहे. समाजात तणाव नाही, असे लोक सापडणे दुर्मीळ आहे. मात्र तणावमुक्त जीवनासाठी रोज ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. शवासन करावे. यामुळे जीवन तणावमुक्त ठेवता येते. मधुमेह झाल्यानंतर योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे सुरू ठेवावीत. नियमित तपासणी हीच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. स्वत:च्या उंचीच्या अर्ध्यापेक्षा कमरेचा घेरा कमी असावा. उंची ६० इंच असेल तर ३० इंचापेक्षा कमरेचा घेर जास्त नसावा. आहारावर नियंत्रण आणणे फार गरजेचे आहे. फास्ट फूड, पॅकेट फूड, तळलेले पदार्थ ज्यामध्ये मेदाचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ खाणे पूर्णपणे थांबवावे. वरणभात-भाजीपोळी असा साधा आहार रोज असावा. थंड पेये टाळावेत. याशिवाय मधुमेह असलेल्यांना शास्त्रीय आरोग्य शिक्षणाची गरज आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरdiabetesमधुमेह