शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

वृक्षारोपणासोबत यंदा स्वच्छतेचा जागर : भास्करगिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:34 IST

‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार

सुहास पठाडेनेवासा : ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी माहिती देवगड संस्थांनचे महंत ह.भ. प. भास्करगिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथील श्री. समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पायी पालखी दिंडी ही पंढरीच्या वाटेवर स्वच्छता अभियानद्वारे वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. शिस्तबद्ध दिंडीची ही परंपरा कायम सुरू आहे.दिंडीची परंपरा कधीपासून आहे?भास्करगिरी महाराज : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांची दिंडी शिस्त पाळत व नियमांचे पालन करत गेल्या ४५ वर्षांपासून वारकऱ्यांना बरोबर घेऊन परंपराची जोपासना करत आहे. या दिंडीत दीड हजार महिला व पुरुषांचा समावेश असतो.दिंडीत शिस्त व नियम कायम आहे. दिंडीच्या व्यवस्थेसाठी पंचवीस वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, जीप, पाणी टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. दिंडीतील सुरक्षा अधिकारी हे दिंडीवर नियंत्रण ठेऊन असतात. या दिंडीमध्ये शिस्तबद्धपणा व उत्तम नियोजनासाठी सुरक्षारक्षकांकडे वॉकीटॉकीची यंत्रणा दिलेली असते.

दिंडीचे वेळापत्रक कसे असते?भास्करगिरी महाराज : दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना दिवसासह रात्री विसाव्याची तसेच भोजन व्यवस्थेसाठी स्वयंपाकासाठी आचारी यांची नियुक्ती केली जाते. शिधा देणारे भाविक व्यवस्थापनाकडे वारकºयांना रुचेल-पचेल असा शिधा देतात. तो शिधा भोजनाच्या प्रसाद रूपाने वाटला जातो. मुक्कामी स्थळावर दिंडीतील वारकरी हे पहाटे ३ वाजता उठतात. स्नानासाठी पाण्याच्या टँकरवरच अंघोळीची व्यवस्था केली जाते. यामध्ये स्रियांसाठी ही वेगळी व्यवस्था असते. त्यानंतर सनईवादन, पांडुरंगाचे अभंग, गीतापाठ, काकडा भजन होते. त्यानंतर आरती व सर्वांना चहापान,नाष्ट्याची व्यवस्था केली जाते.

नेवासा-घोडेगाव- नगरपर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णी पर्यंत रस्ता खडतर व अरुंद आहे. जड वाहनांना रस्ता मोकळा करत कसरतीने दिंड्यांना पुढे जावे लागते. याच रस्त्यावर अनेक दिंड्या येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. -भास्करगिरी महाराज

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा