शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासोबत यंदा स्वच्छतेचा जागर : भास्करगिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:34 IST

‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार

सुहास पठाडेनेवासा : ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी माहिती देवगड संस्थांनचे महंत ह.भ. प. भास्करगिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथील श्री. समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पायी पालखी दिंडी ही पंढरीच्या वाटेवर स्वच्छता अभियानद्वारे वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. शिस्तबद्ध दिंडीची ही परंपरा कायम सुरू आहे.दिंडीची परंपरा कधीपासून आहे?भास्करगिरी महाराज : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांची दिंडी शिस्त पाळत व नियमांचे पालन करत गेल्या ४५ वर्षांपासून वारकऱ्यांना बरोबर घेऊन परंपराची जोपासना करत आहे. या दिंडीत दीड हजार महिला व पुरुषांचा समावेश असतो.दिंडीत शिस्त व नियम कायम आहे. दिंडीच्या व्यवस्थेसाठी पंचवीस वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, जीप, पाणी टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. दिंडीतील सुरक्षा अधिकारी हे दिंडीवर नियंत्रण ठेऊन असतात. या दिंडीमध्ये शिस्तबद्धपणा व उत्तम नियोजनासाठी सुरक्षारक्षकांकडे वॉकीटॉकीची यंत्रणा दिलेली असते.

दिंडीचे वेळापत्रक कसे असते?भास्करगिरी महाराज : दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना दिवसासह रात्री विसाव्याची तसेच भोजन व्यवस्थेसाठी स्वयंपाकासाठी आचारी यांची नियुक्ती केली जाते. शिधा देणारे भाविक व्यवस्थापनाकडे वारकºयांना रुचेल-पचेल असा शिधा देतात. तो शिधा भोजनाच्या प्रसाद रूपाने वाटला जातो. मुक्कामी स्थळावर दिंडीतील वारकरी हे पहाटे ३ वाजता उठतात. स्नानासाठी पाण्याच्या टँकरवरच अंघोळीची व्यवस्था केली जाते. यामध्ये स्रियांसाठी ही वेगळी व्यवस्था असते. त्यानंतर सनईवादन, पांडुरंगाचे अभंग, गीतापाठ, काकडा भजन होते. त्यानंतर आरती व सर्वांना चहापान,नाष्ट्याची व्यवस्था केली जाते.

नेवासा-घोडेगाव- नगरपर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णी पर्यंत रस्ता खडतर व अरुंद आहे. जड वाहनांना रस्ता मोकळा करत कसरतीने दिंड्यांना पुढे जावे लागते. याच रस्त्यावर अनेक दिंड्या येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. -भास्करगिरी महाराज

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा