शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

वृक्षारोपणासोबत यंदा स्वच्छतेचा जागर : भास्करगिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:34 IST

‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार

सुहास पठाडेनेवासा : ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी माहिती देवगड संस्थांनचे महंत ह.भ. प. भास्करगिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथील श्री. समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पायी पालखी दिंडी ही पंढरीच्या वाटेवर स्वच्छता अभियानद्वारे वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. शिस्तबद्ध दिंडीची ही परंपरा कायम सुरू आहे.दिंडीची परंपरा कधीपासून आहे?भास्करगिरी महाराज : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांची दिंडी शिस्त पाळत व नियमांचे पालन करत गेल्या ४५ वर्षांपासून वारकऱ्यांना बरोबर घेऊन परंपराची जोपासना करत आहे. या दिंडीत दीड हजार महिला व पुरुषांचा समावेश असतो.दिंडीत शिस्त व नियम कायम आहे. दिंडीच्या व्यवस्थेसाठी पंचवीस वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, जीप, पाणी टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. दिंडीतील सुरक्षा अधिकारी हे दिंडीवर नियंत्रण ठेऊन असतात. या दिंडीमध्ये शिस्तबद्धपणा व उत्तम नियोजनासाठी सुरक्षारक्षकांकडे वॉकीटॉकीची यंत्रणा दिलेली असते.

दिंडीचे वेळापत्रक कसे असते?भास्करगिरी महाराज : दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना दिवसासह रात्री विसाव्याची तसेच भोजन व्यवस्थेसाठी स्वयंपाकासाठी आचारी यांची नियुक्ती केली जाते. शिधा देणारे भाविक व्यवस्थापनाकडे वारकºयांना रुचेल-पचेल असा शिधा देतात. तो शिधा भोजनाच्या प्रसाद रूपाने वाटला जातो. मुक्कामी स्थळावर दिंडीतील वारकरी हे पहाटे ३ वाजता उठतात. स्नानासाठी पाण्याच्या टँकरवरच अंघोळीची व्यवस्था केली जाते. यामध्ये स्रियांसाठी ही वेगळी व्यवस्था असते. त्यानंतर सनईवादन, पांडुरंगाचे अभंग, गीतापाठ, काकडा भजन होते. त्यानंतर आरती व सर्वांना चहापान,नाष्ट्याची व्यवस्था केली जाते.

नेवासा-घोडेगाव- नगरपर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णी पर्यंत रस्ता खडतर व अरुंद आहे. जड वाहनांना रस्ता मोकळा करत कसरतीने दिंड्यांना पुढे जावे लागते. याच रस्त्यावर अनेक दिंड्या येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. -भास्करगिरी महाराज

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा