शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीने काटे सहन करण्याची तयारी ठेवावी : यशवंतराव गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:46 IST

अहमदनगर : राजकारण म्हणजे केवळ फुलांवरून चालने एवढे सोपे राजकारण नाही. राजकारणात अनेक काटे असतात. ते सहन करण्याची तयारी नव्या पिढीने ...

अहमदनगर : राजकारण म्हणजे केवळ फुलांवरून चालने एवढे सोपे राजकारण नाही. राजकारणात अनेक काटे असतात. ते सहन करण्याची तयारी नव्या पिढीने ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नगर येथे व्यक्त केले.कै. राजीव अप्पासाहेब राजळे व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते़ पालकमंत्री राम शिदे, आ. शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी यावेळी उपस्थित होते. आकाशात अत्यंत तेजस्वी लुककणारा तारा आला नि गेला, असे सांगून गडाख यांनी माजी आमदार राजीव राजळे यांच्या स्वभावाचे विविध पैलूंवर भाष्य केले. ते म्हणाले, भाषणातून नेहमी सांगितले जाते की तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. प्रत्यक्षात राजकारणातील नव्या पिढीच्या युवा नेत्यांचे अनुभव खूप वेगळे आहेत़ राजकारणी एका ठराविक चौकटींच्या बाहेर जात नाहीत पण, राजाभाऊ चौकटीतला माणूस नव्हता. त्याने समाजाचा सर्व बाजंूनी अभ्यास केला़त्यामुळे त्यांचे कर्र्र्तृत्व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनाच नव्हे तर पक्षांनाही झेपल नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राजकरणातील व्यक्तींचा एकमेकांशी असलेला संवाद कमी झाला आहे़ जुन्या पिढीने हा जिल्हा एका उंचीवर नेऊन ठेवला़ जुन्या पिढीतील सर्व नेत्यांचा आवर्जून उल्लेख करत गडाख जुन्या नेत्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते़ एकमेकांच्या दुखात ते सहभागी असायचे. एकमेकांच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहायचे. राजकरणापलिकडे जावून त्यांनी वैयक्तिक संबध जपले़ त्यांच्यात उत्तम संवाद होता. त्यामुळे जिल्ह्याचे वजन होते़ राजकारणाला त्यांनी एक परंपरा घालून दिली़ खाल्याच्या पातळीवर जावून त्यांनी राजकारण केले नाही, असे गडाख यावेळी म्हणाले.

राजाभाऊ लोकल टु ग्लोबल व्यक्ती

राजाभाऊ आणि माझी भेट दिल्ली येथील कॅफे हाऊसमध्ये झाली. ही व्यक्ती कधी कॉफी, कधी विदेशी लेखन, गावातल्या समस्या, अशा विविध विषयांवर बोलत असे. हा माणू जसाअंतराष्ट्रीय परिषदेत जसा शोभायचा तसाच तो गावातल्या चौक सभेतही उठून दिसायचा, असे सांगून मंदार भारदे यांनी राजीव राजळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRajiv Rajaleराजीव राजळे