शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

देवगड- भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी बाबांच्या समाधीचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:56 IST

नेवासा : गुरूंची कीर्ती व महिमा अगाध असा असून गुरूंबद्दल असलेल्या अंतकरणातील भक्तीभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असा संदेश श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्त गणांसाठी बोलताना दिला.

नेवासा : गुरूंची कीर्ती व महिमा अगाध असा असून गुरूंबद्दल असलेल्या अंतकरणातील भक्तीभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असा संदेश श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्त गणांसाठी बोलताना दिला.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे तसेच पंचमुखी सिद्धेश्वर शिवलिंनाचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले.आरती झाल्यानंतर गुरू वंदन केले. 

भक्तांसाठी संदेश देतांना गुरूवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की भगवान दत्तात्रय हे गुरूंचे ही गुरू आहे,गुरूंची कीर्ती व महिमा अगाध असा आहे,गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशभर श्रद्धेने आज गुरुपूजन केले जात असून अंतकरणातील भक्तिभाव प्रत्येकजण यानिमित्ताने व्यक्त करत आहे.व्यास पोर्णिमा येथील या निमित्ताने साजरी होत आहे.

आज कोरोना सारख्या महामारीच्या आजाराने जगासह देशाला ही ग्रासले आहे,केंद्र व राज्य शासनाने नियम व बंधने घालून चांगले काम केले आहे करीत आहे,सर्वांनी शासनाने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळलेच पाहिजे,या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दीत करणे व गर्दीत जाणे ही सर्वांनी टाळले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली.

या अगोदर देवगड येथे गुरुपौर्णिमा सारखा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत होता पण कोरोनाच्या महा मारीमुळे शासन नियमांचे पालन म्हणून मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पूजापाठ करून गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी केली आहे.गुरूंबद्दल असलेला अंतकरणातील भाव हा भक्तांची श्रद्धा दृढ करतो, जीवनात येणाऱ्या अडचणी व संकटे गुरूच्या स्मरणाने दूर होते.भगवान दत्तात्रय हे गुरूंचे गुरू असून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घरी राहून सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी करावी

तसेच पाटावर वस्त्र ठेऊन गुरूंच्या प्रतिमा व मूर्तीचे पूजन करावे मनात ध्यान करावे पूजाअर्चा करावी मनोभावे पूजा झाल्यास वेगळा आनंद सर्वांना प्राप्त होईल असे सांगून त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना सुख शांती समाधानाची प्राप्ती होवो असा शुभाशीर्वाद त्यांनी देश व राज्यातील भक्तांना यावेळी बोलताना दिला.

कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी प्रथमच भक्तांविना गुरुपौर्णिमा देवगडला साजरी झाली.भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये घरी बसूनच गुरुपौर्णिमा साजरी करावी असे आवाहन याआधीच गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी भक्तगणांना केले होते त्यामुळे गुरुपौर्णिमेला एरवी गजबजलेला देवगडचा परिसर निर्मनुष्य दिसत होता मंदिर परिसरात ही शुकशुकाट दिसून येत होता.