शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मधमाशा जगल्या तरच जग जगेल- संपत वाकचौरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:22 IST

अहमदनगर : मधमाशा असतील तरच परागीभवन होईल. परागीभवन झाले तरच धान्य उत्पादन वाढेल. धान्य उत्पादनामुळेच माणसं जगतील. म्हणून मधमाशा याच खºया जगाच्या पोशिंदा आहेत. त्यामुळे मधमाशा जगल्या तरच जग जगेल, असे स्पष्ट मत अकोले तालुक्यातील वाशेरे येथील मधमाशापालक शेतकरी संपत वाकचौरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्र सरकारने कोरोनाच्या आर्थिक पॅकेजमध्ये मधमाशापालनासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

अहमदनगर : मधमाशा असतील तरच परागीभवन होईल. परागीभवन झाले तरच धान्य उत्पादन वाढेल. धान्य उत्पादनामुळेच माणसं जगतील. म्हणून मधमाशा याच खºया जगाच्या पोशिंदा आहेत. त्यामुळे मधमाशा जगल्या तरच जग जगेल, असे स्पष्ट मत अकोले तालुक्यातील वाशेरे येथील मधमाशापालक शेतकरी संपत वाकचौरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्र सरकारने कोरोनाच्या आर्थिक पॅकेजमध्ये मधमाशापालनासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.-----------प्रश्न- सरकारने पॅकेज दिले, याबद्दल काय वाटते?उत्तर-मधमाशाबाबत केंद्र सरकारने त्यांच्या आर्थिक पॅकेजमध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा पैसा मधमाशा पालन करणाºया शेतकºयांपर्यंत पोहोचला तर मधमाशा पालनाला गती येईल. सरकारच्या दिलेल्या पैशांचा मधमाशा पालनाबाबत आधुनिक तंत्र विकसित करण्यास मदत होईल. मुळात सरकारने मधमाशापालनाबाबत त्यांच्या आर्थिक पॅकेजमध्ये विचार केला, त्यासाठी तरतूद केली ही गोष्ट फार चांगली झाली. मधमाशाबाबत सरकार जागे झाले, याचा आनंद आहे. पर्यावरण रक्षण, औषध, मधनिर्मिती या गोष्टीला चालना मिळेल. मात्र तो पैसा थेट मिळाला तर अधिक चांगले होईल.----------प्रश्न- मधमाशा पालनात काय आव्हाने आहेत?उत्तर- शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकांवर रासायनिक फवारे मारतात. त्यामुळेच मशमाशा नष्ट होत आहेत. मधमाशा पालनाचे शेतकºयांनाच अद्याप महत्त्व कळालेले नाही, हे दुर्दैव आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाशा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परागीभवन असेल तरच उत्पादन वाढेल. झाडे लावून कार्बन डायआॅक्साईड हटविला तर मधमाशा जास्तीत जास्त जगतील. जास्तीत जास्त उद्याने तयार होणेही गरजेचे आहे.----प्रश्न- बाजारातील मध नैसर्गिक असतात का?उत्तर- बाजारात मिळणारे सर्वच मध नैसर्गिक असतात हे मुळीच नाही. प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक फळावर तयार झालेल्या मोहोळात तयार झालेला मध हा विविध आजारांवर गुणकारी असतो. जांभळाच्या झाडावर मोहोळ असेल तर तो मध मधुमेहमुक्तीसाठी लाभदायी ठरतो. वेगवेगळ््या झाडांवरील मधाचे वेगवेगळे फ्लेवर राहतात. मधामुळे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहते. बाजारातील मिळणाºया मधात गुळाचे पाणी मिसळले जाते. बाजारात मिळणारे मध हे कधीच एकसारखे नसतात.--प्रश्न- शेतकºयांनी काय केले पाहिजे?उत्तर- मधमाशा पालनाबाबत कृषी खात्यामार्फत प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी शेतकरीच असला पाहिजे, असे मुळीच नाही. शेतकरी गटाच्या माध्यमातून मधमाशा पालनासाठी पेट्या मिळतात. मधमाशा आकृष्ट होण्यासाठी हंगामानुसार पिके घेतली पाहिजेत. झेंडू आणि इतर फुलांची झाडे आवर्जून लावली पाहिजेत. पिकांवर रासायनिक फवारे मारू नयेत.----------------यासाठी होईल पॅकेजचा उपयोगमधमाशापालन केले तर परागसिंचन वाढते. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. मध व मेण यासारखी उत्पादने मिळतात. मध गोळा करणे, विक्री करणे, साठवण केंद्र निर्मिती करणे, मूल्यवर्धन केंद्र विकसित करणे, मानक आणि शोधप्रणालीची अंमलबजावणी, साठवण आणि पैदास केंद्राचा दर्जेदार विकास करता यावा, यासाठी ही तरतूद आहे. सुमारे दोन लाख मधमाशा पालकांचे या योजनेतून उत्पन्न वाढेल, तसेच ग्राहकांनाही दर्जेदार मध मिळेल, अशी आशा या पॅकेजमध्ये सरकारने केली आहे.