शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराआधीच कार्यकर्त्यांची जुळवणी

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्यासाठी सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्यासाठी सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांनीच तरूणाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या संवाद मेळावे, युवा मेळावे यामुळे निवडणुकीची रणधुमाळी पेटल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षाकडून प्रचाराआधी कार्यकर्त्यांची जुळवणी सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाने त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विकास कामांच्या जोरावर आपली सत्ता राखण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या तरूण मतदारांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतांना दिसत आहे. यासाठी तरूणांचे मेळावे, संवाद यात्रा सुरू झाल्या आहेत. यातून कार्यकर्त्यांची जुळवणी होतांना दिसत आहे. जिल्ह्यातही महिनाभरापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक मेळावे, सभा यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एकत्र आणत निवडणुकीची दिशा स्पष्ट करतांना दिसत आहेत. शेवगावच्या मेळाव्यात माजी आमदार नरेंद्र घुले यांनी यंदाची निवडणूकही तरुणांच्या ताकदीवर लढवायची आहे. भविष्यात सर्व संस्थांमध्ये तरूणांना ५० टक्के प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे. राजकारणात तरूणांचे स्थान महत्वाचे आहे, असे सांगत तरुणांना सोबत येण्यासाठी साद घालतांना दिसले. नेवासा तालुक्यातही आ. शंकरराव गडाख यांनी तरूणांचे दोन मेळावे घेतले. त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडतांना विरोधकांना आव्हान दिले.श्रीगोंद्यात राहुल जगताप यांनी थेट मैदानात उडी घेत, सत्ताधाऱ्यांना आपला मनसुबा दाखवून दिला. घन:श्याम शेलार यांनी निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आपली दिशा स्पष्ट आहे. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार,कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. हे करत असतांना कार्यकर्त्यांना प्रोत्साहनासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झालेले आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघ कसा भकास केला यावर भाषणबाजी सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. (प्रतिनिधी)