शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

प्रचाराआधीच कार्यकर्त्यांची जुळवणी

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्यासाठी सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्यासाठी सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांनीच तरूणाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या संवाद मेळावे, युवा मेळावे यामुळे निवडणुकीची रणधुमाळी पेटल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षाकडून प्रचाराआधी कार्यकर्त्यांची जुळवणी सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाने त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विकास कामांच्या जोरावर आपली सत्ता राखण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या तरूण मतदारांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतांना दिसत आहे. यासाठी तरूणांचे मेळावे, संवाद यात्रा सुरू झाल्या आहेत. यातून कार्यकर्त्यांची जुळवणी होतांना दिसत आहे. जिल्ह्यातही महिनाभरापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक मेळावे, सभा यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एकत्र आणत निवडणुकीची दिशा स्पष्ट करतांना दिसत आहेत. शेवगावच्या मेळाव्यात माजी आमदार नरेंद्र घुले यांनी यंदाची निवडणूकही तरुणांच्या ताकदीवर लढवायची आहे. भविष्यात सर्व संस्थांमध्ये तरूणांना ५० टक्के प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे. राजकारणात तरूणांचे स्थान महत्वाचे आहे, असे सांगत तरुणांना सोबत येण्यासाठी साद घालतांना दिसले. नेवासा तालुक्यातही आ. शंकरराव गडाख यांनी तरूणांचे दोन मेळावे घेतले. त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडतांना विरोधकांना आव्हान दिले.श्रीगोंद्यात राहुल जगताप यांनी थेट मैदानात उडी घेत, सत्ताधाऱ्यांना आपला मनसुबा दाखवून दिला. घन:श्याम शेलार यांनी निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आपली दिशा स्पष्ट आहे. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार,कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. हे करत असतांना कार्यकर्त्यांना प्रोत्साहनासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झालेले आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघ कसा भकास केला यावर भाषणबाजी सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. (प्रतिनिधी)