शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

देवरे यांच्याविरोधात बुधवारपासून कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलो असल्याचे सांगत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवार (दि. २५)पासून ...

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलो असल्याचे सांगत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवार (दि. २५)पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. देवरे यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याने त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

तहसीलदार देवरे यांची क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना शनिवारी (दि. २१) निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे की, देवरे यांच्याविरुद्ध याआधी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांनी २५ मे २०२१ रोजीच पुरावे सादर केले होते; मात्र आमदार नीलेश लंके आणि प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी मध्यस्थी करीत कोरोना परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन करू नये, असे ठरले होते; मात्र आता देवरे यांच्यासोबत काम करणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

---

कर्मचाऱ्यांनी निवेदनात केलेले आरोप

देवरे यांच्या निर्णयाविरुद्ध उपोषण करणाऱ्या संपत आंधळे यांच्या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला होता. देवरे यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील संचिका गायब करून कर्मचाऱ्यांनाच अडचणीत आणण्याचे प्रकार देवरे यांनी केले होते. विविध प्रकरणातील कारवाईबाबतच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संचिका देवरे यांनी परत केलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कोणत्याही प्रस्तावावर देवरे निर्णय घेत नाहीत. त्यामुळे मंडलाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. कारवाई झालेल्या वाळूच्या वाहनांवर दंड न करता ती सोडून दिल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. देवरे या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. महिलांना रात्री-अपरात्री बैठकांना बोलविले जाते, असाही आरोप कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.