शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पुलांच्या कामाची चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले ...

श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले आहेत. भुयारी रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचल्यामुळे राजमार्गाची वाहतूक अनेक वेळा बंद पडली होती. या निकृष्ट कामाची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करून दुरुस्ती करून पुलाखाली पाणी साचणार नाही, याचे ठेकेदाराकडून लेखी घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चितळी (ता. राहाता) रेल्वेस्टेशन जवळ व श्रीरामपूर एमआयडीसीजवळ धनगरवाडी रोडवर गेट नं. १५२, यशवंतबाबा चौकी येथे रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते केले आहेत. २०२० मध्ये पावसाळ्यात व अवकाळी पावसामुळे असे ३ ते ४ वेळा पाणी साचून रस्त्याने होणारी वाहतूक सुमारे सप्ताहभर बंद राहिली होती. पाणी काढण्याचे इंजीन लावून पाणी बाजूच्या शेतात सोडण्यात आले होते. चितळी रेल्वेस्थानक भुयारी ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे राहाता, चितळा, श्रीरामपूर हा राजमार्ग बंद पडला होता. ट्रॅक्टरवरील दोन पंप लावूनसुद्धा पाणी अनेक दिवस न हटल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दैनंदिन उलाढालीवर परिणाम होऊन दूध, भाजीपाला व शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. रस्त्याने जाणारी वाहने व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. चितळी ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली विष्णू वाघ व ग्रामपंचायत सदस्यांनी मध्य रेल्वे सोलापूर विभागास निवेदने देऊन भुयारी रस्ते पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाहीची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अद्याप भुयारी रस्ते दुरुस्तीचे काम केले नाही. पाणी साचू नये म्हणून कार्यवाही केली नाही. यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी भुयारी पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करावे, अशी मागणी धनगरवाडी व चितळी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने केली आहे. मे महिन्यापर्यंत काम न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

दोन्ही भुयारी रस्ते पुलाखाली गत पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक खोळंबली होती. रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते व पुलाखाली आतापर्यंत मोठा खर्च करून पाणी काढण्याचे काम केले हा खर्च पाण्यातच गेला अशी भावना ग्रामस्थांची असून पाणी साचणार नाही असे काम त्वरित करावे किंवा दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करावेत अशी मागणी होत आहे.