शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रेल्वे पुलांच्या कामाची चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले ...

श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले आहेत. भुयारी रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचल्यामुळे राजमार्गाची वाहतूक अनेक वेळा बंद पडली होती. या निकृष्ट कामाची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करून दुरुस्ती करून पुलाखाली पाणी साचणार नाही, याचे ठेकेदाराकडून लेखी घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चितळी (ता. राहाता) रेल्वेस्टेशन जवळ व श्रीरामपूर एमआयडीसीजवळ धनगरवाडी रोडवर गेट नं. १५२, यशवंतबाबा चौकी येथे रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते केले आहेत. २०२० मध्ये पावसाळ्यात व अवकाळी पावसामुळे असे ३ ते ४ वेळा पाणी साचून रस्त्याने होणारी वाहतूक सुमारे सप्ताहभर बंद राहिली होती. पाणी काढण्याचे इंजीन लावून पाणी बाजूच्या शेतात सोडण्यात आले होते. चितळी रेल्वेस्थानक भुयारी ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे राहाता, चितळा, श्रीरामपूर हा राजमार्ग बंद पडला होता. ट्रॅक्टरवरील दोन पंप लावूनसुद्धा पाणी अनेक दिवस न हटल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दैनंदिन उलाढालीवर परिणाम होऊन दूध, भाजीपाला व शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. रस्त्याने जाणारी वाहने व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. चितळी ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली विष्णू वाघ व ग्रामपंचायत सदस्यांनी मध्य रेल्वे सोलापूर विभागास निवेदने देऊन भुयारी रस्ते पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाहीची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अद्याप भुयारी रस्ते दुरुस्तीचे काम केले नाही. पाणी साचू नये म्हणून कार्यवाही केली नाही. यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी भुयारी पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करावे, अशी मागणी धनगरवाडी व चितळी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने केली आहे. मे महिन्यापर्यंत काम न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

दोन्ही भुयारी रस्ते पुलाखाली गत पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक खोळंबली होती. रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते व पुलाखाली आतापर्यंत मोठा खर्च करून पाणी काढण्याचे काम केले हा खर्च पाण्यातच गेला अशी भावना ग्रामस्थांची असून पाणी साचणार नाही असे काम त्वरित करावे किंवा दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करावेत अशी मागणी होत आहे.