शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पुलांच्या कामाची चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले ...

श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी असलेले रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी रस्ते मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केले आहेत. भुयारी रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचल्यामुळे राजमार्गाची वाहतूक अनेक वेळा बंद पडली होती. या निकृष्ट कामाची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करून दुरुस्ती करून पुलाखाली पाणी साचणार नाही, याचे ठेकेदाराकडून लेखी घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चितळी (ता. राहाता) रेल्वेस्टेशन जवळ व श्रीरामपूर एमआयडीसीजवळ धनगरवाडी रोडवर गेट नं. १५२, यशवंतबाबा चौकी येथे रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते केले आहेत. २०२० मध्ये पावसाळ्यात व अवकाळी पावसामुळे असे ३ ते ४ वेळा पाणी साचून रस्त्याने होणारी वाहतूक सुमारे सप्ताहभर बंद राहिली होती. पाणी काढण्याचे इंजीन लावून पाणी बाजूच्या शेतात सोडण्यात आले होते. चितळी रेल्वेस्थानक भुयारी ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे राहाता, चितळा, श्रीरामपूर हा राजमार्ग बंद पडला होता. ट्रॅक्टरवरील दोन पंप लावूनसुद्धा पाणी अनेक दिवस न हटल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दैनंदिन उलाढालीवर परिणाम होऊन दूध, भाजीपाला व शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. रस्त्याने जाणारी वाहने व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. चितळी ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली विष्णू वाघ व ग्रामपंचायत सदस्यांनी मध्य रेल्वे सोलापूर विभागास निवेदने देऊन भुयारी रस्ते पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाहीची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अद्याप भुयारी रस्ते दुरुस्तीचे काम केले नाही. पाणी साचू नये म्हणून कार्यवाही केली नाही. यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी भुयारी पुलाखाली पाणी साचणार नाही, असे काम करावे, अशी मागणी धनगरवाडी व चितळी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने केली आहे. मे महिन्यापर्यंत काम न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

दोन्ही भुयारी रस्ते पुलाखाली गत पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक खोळंबली होती. रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्ते व पुलाखाली आतापर्यंत मोठा खर्च करून पाणी काढण्याचे काम केले हा खर्च पाण्यातच गेला अशी भावना ग्रामस्थांची असून पाणी साचणार नाही असे काम त्वरित करावे किंवा दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करावेत अशी मागणी होत आहे.