शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा वितरणाचे काम ठप्प

By admin | Updated: April 26, 2016 23:25 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी मंगळवारी संपावर गेले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे़

अहमदनगर : जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी मंगळवारी संपावर गेले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे़ परिणामी नागरिकांना मिळणारे सातबारे, फेरफार आणि आठ अ ही महत्वाची कागदपत्रे मिळणे बंद झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे़सरकारकडून बहुतांश सेवा आॅनलाईन करण्यात आल्या आहेत़ मात्र, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत़ त्यामुळे गावोगावी आॅनलाईन सेवा पुरविणे कठीण झाले आहे़ वारंवार मागणी करूनदेखील सुधारणा न झाल्याने नागरिकांच्या रोषाला तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते़ अखेर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी कनेक्टीव्हीटी या प्रमुख मागणीसाठी संपाची हाक दिली असून, राज्यभरातील तलाठी संपावर गेले आहेत़ या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील ५८३ तलाठी कार्यालये तलाठ्यांनी सकाळपासूनच बंद ठेवले़ कार्यालये उघडलीच नाहीत़ कार्यालये बंद ठेवून तलाठ्यांनी सातबारा देणे, त्यावर बोजा चढविणे, कमी करणे, फेरफार देणे, आठ अ वितरीत करणे, ही कामे केली नाहीत़ त्यामुळे गावातील ही सेवा पूर्णपणे कोलमडली असून, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे़ आॅनलाईन सातबारा ही सेवा सुरू झाली़ मात्र, त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात सरकार उदासीन आहे़ ग्रामीण भागात १२ तासांचे भारनियमन आहे़ तासन्तास नेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही़ तालुकास्तरावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली नाही़ त्यामुळे या सेवेचा अल्पावधीतच बोजवारा उडाला़ त्याचा तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे़ जोपर्यंत सरकार यासंदर्भात निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीशी संबंधीत व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)डिजिटल सिग्नेचर सरकारजमामाहिती व तंत्रज्ञान विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांना डिजिटल सिग्नेचर पुरविण्यात आले होते़ लॅपटॉपला जोडल्यानंतर नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळतो़ ते तलाठ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत़ग्रामीण भागात कनेक्टीव्हीटी मिळत नाही़ त्यामुळे काम करणे कठीण झाले आहे़ वारंवार मागणी करूनदेखील सुधारणा झाली नाही़ त्यामुळे संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालये बंद करण्यात आली आहेत़ हा संप बेमुदत असून, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील़-दिनकर घोडे, सदस्य- राज्य कार्यकारी तलाठी संघ