शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

शेतकरी महिलांनी उद्योजक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

राहुरी : परसबागेतील भाजीपाला व कुक्कुटपालन या जोडधंद्याची जोड दिली तर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. ...

राहुरी : परसबागेतील भाजीपाला व कुक्कुटपालन या जोडधंद्याची जोड दिली तर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. शेतीबरोबरच महिला उद्योजक निर्माण झाल्या पाहिजेत. महिलांनी कृषीच्या तंत्रज्ञानाचे धडे घेतले तर त्या बचतगटाच्या माध्यमातून इतर महिलांना याबाबत अवगत करू शकतात, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.अशोक फरांदे यांनी केेले.

कृषिविस्तार व संज्ञापन विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या दोनदिवसीय अनुसूचित जाती महिलांच्या स्थिती स्थापकत्वाचे बळकटीकरण या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.फरांदे बोलत होते.

प्रमुख पाहुणे डॉ. श्रीमंत रणपिसे म्हणाले, फळप्रक्रिया उद्योगात खूप संधी उपलब्ध आहेत. आवळा प्रक्रिया करून अनेक महिलांनी गृहउद्योग सुरू केले आहेत. आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ दिले आहे.

प्रास्ताविक डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. प्रशिक्षणास २५ अनुसूचित जाती महिला उपस्थित होत्या. यावेळी डॉ. विष्णू गरंडे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. भगवान देशमुख, डॉ. विक्रम कड, डॉ. प्रमोद साखरे, प्रा.धनश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची रूपरेषा डॉ. गोरक्ष ससाणे यांनी विशद केली. सूत्रसंचालन पद्मकुमार पाटील यांनी केले. डॉ. ज्ञानदेव फराटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. मनोहर धादवड, राजुदास राठोड, विश्वनाथ पवार, विश्वनाथ तोंडे व अनिल येवले यांनी विशेष परिश्रम घेतले.