शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महिलेचा गळा आवळून खून : श्रीगोंदा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:44 IST

एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले.

श्रीगोंदा : एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले.मंगळवार ३१ जुलैस दुपारी ४ वाजेच्या सुमारास औटेवाडी तलावातील पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळला. सुरूवातीस ही महिला पाय घसरून पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मृतदेह जागचा हलेना. तेव्हा मृतदेहाच्या अंगाभोवती दोरी गुंडाळण्यात आली होती. त्या दोरीला दोन्ही बाजूने दगड बांधल्याने हा मृतदेह जागचा हलत नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असता या महिलेच्या अंगावर एकही कापड नव्हते. तिच्या अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. इतरत्र खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह या तलावातील खड्ड्यात टाकून देण्यात आला असावा, पोलिसांचा कयास आहे.आजुबाजूच्या पोलीस ठाण्यांकडून हरवल्याबाबतची माहिती मागविली आहे. या महिलेची ओळख पटवून खुनाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा.दोन दिवसांपूर्वी पाण्यात प्रेतऔटेवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी रविवारी तलावात खड्डा खोदला आहे. सोमवारी रात्री हा मृतदेह याठिकानी आणून टाकला असावा. बाजूच्या शेतकºयाने खडड्यात डोकावून पाहिले असता त्याला मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या गुन्ह्याच्या तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व न्यायवैद्यक पथकाची मदत घेतली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा