शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसात १ कोटी ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:35 IST

महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे११०२ मीटरची तपासणी४८७ मीटरमध्ये चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. स्थानिक अभियंते, कर्मचारी आणि इतर जिल्ह्यातून आलेली भरारी पथके यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ११०२ ग्राहकांच्या मीटरपैकी ४८७ जणांकडे वीजचोरी आढळून आली असून संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे.पथकांनी जिल्ह्यातील अहमदनगर शहर, ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागांमध्ये सलग तीन दिवस व्यापक तपासणी मोहीम राबवून वीजचोरी उघडकीस आणली. पथकाद्वारे ५११ घरगुती, ४८० व्यावसायिक व १११ औद्योगिक ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ४८७ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यातील २२१ घरगुती, १२८ व्यावसायिक आणि ६ औद्योगिक अशा एकूण ३११ ग्राहकांविरुद्ध वीज कायदा २००३ चे कलम १३५ ते १३८ नुसार तर १७६ ग्राहकांवर कलम १२६ नुसार कारवाई सुरू आहे. स्थानिक अभियंते व कर्मचाºयांच्या पथकांने ८४३ ग्राहकांकडे तपासणी करून ३२२ ठिकाणची वीज चोरी उघडकीस आणली. भरारी पथकाने तपासणी केलेल्या २५९ ग्राहकांपैकी १६५ जणांकडे वीज चोरी आढळून आली. विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ग्राहकांपैकी ४४ टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली आहे.कलम १३५ ते १३८ नुसार ३११ जणांना ८१ लाख ६९ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले असून २० लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील १२ जणांनी वीजचोरीचे ४ लाख ३१ हजार तसेच दंडाची ९१ हजार रुपयांची रक्कम भरली. तर ८ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या १७६ जणांना ४८ लाख रुपयांच्या वीज चोरीचे बिल देण्यात आले असून १० जणांनी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

  • वीजचोरीला प्रतिबंध करण्यात सहकार्य करा
  • महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी अहमदनगर जिल्ह्यात आहे. जानेवारी- २०१८ अखेर जिल्यातील एकूण ९ लाख ७७ हजार ८४० वीज ग्राहकांपैकी ६ लाख २७ हजार १३७ ग्राहकांकडे २ हजार ६४० कोटी १० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील १५.५९ टक्के आणि वाणिज्यिक हानी ३९.६४ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज चोरीला पूर्णपणे प्रतिबंध कारणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण