शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसात १ कोटी ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:35 IST

महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे११०२ मीटरची तपासणी४८७ मीटरमध्ये चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. स्थानिक अभियंते, कर्मचारी आणि इतर जिल्ह्यातून आलेली भरारी पथके यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ११०२ ग्राहकांच्या मीटरपैकी ४८७ जणांकडे वीजचोरी आढळून आली असून संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे.पथकांनी जिल्ह्यातील अहमदनगर शहर, ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागांमध्ये सलग तीन दिवस व्यापक तपासणी मोहीम राबवून वीजचोरी उघडकीस आणली. पथकाद्वारे ५११ घरगुती, ४८० व्यावसायिक व १११ औद्योगिक ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ४८७ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यातील २२१ घरगुती, १२८ व्यावसायिक आणि ६ औद्योगिक अशा एकूण ३११ ग्राहकांविरुद्ध वीज कायदा २००३ चे कलम १३५ ते १३८ नुसार तर १७६ ग्राहकांवर कलम १२६ नुसार कारवाई सुरू आहे. स्थानिक अभियंते व कर्मचाºयांच्या पथकांने ८४३ ग्राहकांकडे तपासणी करून ३२२ ठिकाणची वीज चोरी उघडकीस आणली. भरारी पथकाने तपासणी केलेल्या २५९ ग्राहकांपैकी १६५ जणांकडे वीज चोरी आढळून आली. विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ग्राहकांपैकी ४४ टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली आहे.कलम १३५ ते १३८ नुसार ३११ जणांना ८१ लाख ६९ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले असून २० लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील १२ जणांनी वीजचोरीचे ४ लाख ३१ हजार तसेच दंडाची ९१ हजार रुपयांची रक्कम भरली. तर ८ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या १७६ जणांना ४८ लाख रुपयांच्या वीज चोरीचे बिल देण्यात आले असून १० जणांनी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

  • वीजचोरीला प्रतिबंध करण्यात सहकार्य करा
  • महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी अहमदनगर जिल्ह्यात आहे. जानेवारी- २०१८ अखेर जिल्यातील एकूण ९ लाख ७७ हजार ८४० वीज ग्राहकांपैकी ६ लाख २७ हजार १३७ ग्राहकांकडे २ हजार ६४० कोटी १० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील १५.५९ टक्के आणि वाणिज्यिक हानी ३९.६४ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज चोरीला पूर्णपणे प्रतिबंध कारणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण