शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसात १ कोटी ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:35 IST

महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे११०२ मीटरची तपासणी४८७ मीटरमध्ये चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. स्थानिक अभियंते, कर्मचारी आणि इतर जिल्ह्यातून आलेली भरारी पथके यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ११०२ ग्राहकांच्या मीटरपैकी ४८७ जणांकडे वीजचोरी आढळून आली असून संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे.पथकांनी जिल्ह्यातील अहमदनगर शहर, ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागांमध्ये सलग तीन दिवस व्यापक तपासणी मोहीम राबवून वीजचोरी उघडकीस आणली. पथकाद्वारे ५११ घरगुती, ४८० व्यावसायिक व १११ औद्योगिक ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ४८७ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यातील २२१ घरगुती, १२८ व्यावसायिक आणि ६ औद्योगिक अशा एकूण ३११ ग्राहकांविरुद्ध वीज कायदा २००३ चे कलम १३५ ते १३८ नुसार तर १७६ ग्राहकांवर कलम १२६ नुसार कारवाई सुरू आहे. स्थानिक अभियंते व कर्मचाºयांच्या पथकांने ८४३ ग्राहकांकडे तपासणी करून ३२२ ठिकाणची वीज चोरी उघडकीस आणली. भरारी पथकाने तपासणी केलेल्या २५९ ग्राहकांपैकी १६५ जणांकडे वीज चोरी आढळून आली. विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ग्राहकांपैकी ४४ टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली आहे.कलम १३५ ते १३८ नुसार ३११ जणांना ८१ लाख ६९ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले असून २० लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील १२ जणांनी वीजचोरीचे ४ लाख ३१ हजार तसेच दंडाची ९१ हजार रुपयांची रक्कम भरली. तर ८ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या १७६ जणांना ४८ लाख रुपयांच्या वीज चोरीचे बिल देण्यात आले असून १० जणांनी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

  • वीजचोरीला प्रतिबंध करण्यात सहकार्य करा
  • महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी अहमदनगर जिल्ह्यात आहे. जानेवारी- २०१८ अखेर जिल्यातील एकूण ९ लाख ७७ हजार ८४० वीज ग्राहकांपैकी ६ लाख २७ हजार १३७ ग्राहकांकडे २ हजार ६४० कोटी १० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील १५.५९ टक्के आणि वाणिज्यिक हानी ३९.६४ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज चोरीला पूर्णपणे प्रतिबंध कारणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण