शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सराफांची संपातून माघार

By admin | Updated: April 26, 2016 23:24 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़

अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़ सराफ व्यावसायिकांसाठी लग्नसराई ही मोठी संधी असते़ यंदा मात्र, लग्नसराईच्या काळात तब्बल ४२ दिवस दुकाने बंद राहिल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले़ आता एप्रिल महिन्याच्या अखेर लग्नसराई संपत आहे़ पुढे मुहूर्त नसल्याने येते चार दिवसच व्यवसायाची चांगली संधी असल्याने बहुतांशी सराफांनी मंगळवारी दुकाने उघडली़ सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने दि. १३ एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. सरकारने मात्र, अबकारी कायद्याबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले होते. २७ एप्रिलपर्यंत हा बंद राहणार होता. नगरच्या सराफांनी मात्र, एक दिवस संप पाळून दुकाने उघडली़ (प्रतिनिधी)दीड महिन्यांचा संप करूनही केंद्र सरकारने सराफांच्या मागण्या मान्य न केल्याने संघटनेने पुन्हा तीन दिवसांचा संप पुकारला आहे़ हा संप २७ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे़ नगरमधील मात्र, काही सराफांनी आपली दुकाने उघडून व्यवसाय केला़ हे खेदजनक आहे़ ही लढाई संघटनेची नसून सर्वच सराफ व्यावसायिकांची आहे़ त्यामुळे सराफांनी संघटनेला साथ देणे गरजेचे आहे़ -सुभाष मुथा, राज्य उपाध्यक्ष, सराफ संघटना