शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर ‘त्या’ आठ शिक्षकांची माघार; ८९ मुख्याध्यापक झाले केंद्रप्रमुख

By चंद्रकांत शेळके | Updated: November 20, 2023 21:13 IST

बोगस पदव्यांच्या चर्चेने प्रशासन सतर्क, जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाच्या २४६ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. पैकी केवळ ३४ पदेच सद्य:स्थितीत भरलेली आहेत.

अहमदनगर : गेली ९ वर्षांपासून रखडलेली प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांची पदोन्नती प्रक्रिया अखेर शिक्षण विभागाने सोमवारी पूर्ण केली. यात एकूण ८९ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदावर पदोन्नती देण्यात आली. दरम्यान, यासाठी काही शिक्षकांनी बोगस पदवीची प्रमाणपत्रे सादर केल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रक्रियेअगोदर शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला. परिणामी ८ शिक्षकांनी या प्रक्रियेतून माघार घेतली.

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाच्या २४६ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. पैकी केवळ ३४ पदेच सद्य:स्थितीत भरलेली आहेत. दरम्यान, एकूण पदांच्या निम्मी म्हणजे १२३ पदे पदोन्नतीने भरायची तरतूद आहे. परंतु, गेली ९ वर्षांपासून विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे पूर्ण जिल्ह्याचा कारभार प्रभारी केंद्रप्रमुखांवरच सुरू होता. दरम्यान, मध्यंतरी अनेक तालुक्यांच्या शिक्षकांनी प्रभारी केंद्रप्रमुखपदाचा कार्यभार सांभाळण्यास नकार दिला. शिक्षक संघटनांनीही पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. त्यामुळे शासनाने पदोन्नतीस हिरवा कंदील दाखवला.

अखेर सोमवारी (दि. २०) जिल्हा परिषदेने केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवली. दरम्यान, या पदोन्नतीसाठी काही शिक्षकांनी बोगस पदवी प्रमाणपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे प्रामाणिक पदवीधारकांवर अन्याय होईल. परिणामी शिक्षण विभागाने दखल घेण्याची तक्रार काही शिक्षक संघटनांनी केली होती. त्यावरून शिक्षण विभागाने या प्रक्रियेआधीच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवून अशा बोगस प्रमाणपत्रांची खातरजमा करण्याच्या सूचना केल्या. शिवाय सोमवारी ही प्रक्रिया राबवताना बोगस प्रमाणपत्र आढळले तर थेट गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली. त्यामुळे या प्रक्रियेतून ८ शिक्षकांनी माघार घेतली.

कारवाईच्या मर्यादा...केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील एकूण ४६० पात्र शिक्षकांची यादी तयार केली होती. या यादीतून सेवाज्येष्ठतेनुसार व समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली. जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाज्येष्ठतेनुसार तालुकानिहाय पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. दरम्यान, ज्यांनी बोगस पदवीचे प्रमाणपत्र सादर केले, अशांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आठ शिक्षकांनी माघार घेतली. परंतु, ही माघार गैरसोयीमुळे घेतली की बोगस प्रमाणपत्रामुळे हे प्रशासनाला कळू शकले नाही. पदोन्नतीचा लाभच न घेतल्याने कारवाई कशी करायची, अशा पेचात प्रशासन पडले. त्यामुळे त्या आठ शिक्षकांची ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ राहिली.