शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर ‘त्या’ आठ शिक्षकांची माघार; ८९ मुख्याध्यापक झाले केंद्रप्रमुख

By चंद्रकांत शेळके | Updated: November 20, 2023 21:13 IST

बोगस पदव्यांच्या चर्चेने प्रशासन सतर्क, जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाच्या २४६ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. पैकी केवळ ३४ पदेच सद्य:स्थितीत भरलेली आहेत.

अहमदनगर : गेली ९ वर्षांपासून रखडलेली प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांची पदोन्नती प्रक्रिया अखेर शिक्षण विभागाने सोमवारी पूर्ण केली. यात एकूण ८९ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदावर पदोन्नती देण्यात आली. दरम्यान, यासाठी काही शिक्षकांनी बोगस पदवीची प्रमाणपत्रे सादर केल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रक्रियेअगोदर शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला. परिणामी ८ शिक्षकांनी या प्रक्रियेतून माघार घेतली.

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाच्या २४६ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. पैकी केवळ ३४ पदेच सद्य:स्थितीत भरलेली आहेत. दरम्यान, एकूण पदांच्या निम्मी म्हणजे १२३ पदे पदोन्नतीने भरायची तरतूद आहे. परंतु, गेली ९ वर्षांपासून विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे पूर्ण जिल्ह्याचा कारभार प्रभारी केंद्रप्रमुखांवरच सुरू होता. दरम्यान, मध्यंतरी अनेक तालुक्यांच्या शिक्षकांनी प्रभारी केंद्रप्रमुखपदाचा कार्यभार सांभाळण्यास नकार दिला. शिक्षक संघटनांनीही पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. त्यामुळे शासनाने पदोन्नतीस हिरवा कंदील दाखवला.

अखेर सोमवारी (दि. २०) जिल्हा परिषदेने केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवली. दरम्यान, या पदोन्नतीसाठी काही शिक्षकांनी बोगस पदवी प्रमाणपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे प्रामाणिक पदवीधारकांवर अन्याय होईल. परिणामी शिक्षण विभागाने दखल घेण्याची तक्रार काही शिक्षक संघटनांनी केली होती. त्यावरून शिक्षण विभागाने या प्रक्रियेआधीच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवून अशा बोगस प्रमाणपत्रांची खातरजमा करण्याच्या सूचना केल्या. शिवाय सोमवारी ही प्रक्रिया राबवताना बोगस प्रमाणपत्र आढळले तर थेट गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली. त्यामुळे या प्रक्रियेतून ८ शिक्षकांनी माघार घेतली.

कारवाईच्या मर्यादा...केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील एकूण ४६० पात्र शिक्षकांची यादी तयार केली होती. या यादीतून सेवाज्येष्ठतेनुसार व समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली. जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाज्येष्ठतेनुसार तालुकानिहाय पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. दरम्यान, ज्यांनी बोगस पदवीचे प्रमाणपत्र सादर केले, अशांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आठ शिक्षकांनी माघार घेतली. परंतु, ही माघार गैरसोयीमुळे घेतली की बोगस प्रमाणपत्रामुळे हे प्रशासनाला कळू शकले नाही. पदोन्नतीचा लाभच न घेतल्याने कारवाई कशी करायची, अशा पेचात प्रशासन पडले. त्यामुळे त्या आठ शिक्षकांची ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ राहिली.