शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

ऐतिहासिक वास्तूंसाठी पायाभूत सुविधा आराखडा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST

अहमदनगर : नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात नवीन काही बांधकाम करण्यापेक्षा त्या वास्तूंचे जतन, संवर्धन कसे करता येईल, यालाच ...

अहमदनगर : नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात नवीन काही बांधकाम करण्यापेक्षा त्या वास्तूंचे जतन, संवर्धन कसे करता येईल, यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यादृष्टीने ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करून निधीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी नगर शहर परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली, त्यामध्ये भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, बागरोजा हडको यासह इतर वास्तूंचा समावेश होता. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ऐतिहासिक वास्तू या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात. वास्तूंच्या परिसरात नवे बांधकाम करण्यासाठी परवानगी, मंजुरीची प्रक्रिया कठीण आहे. त्यामध्ये मोठे वेळ जातो. त्यामुळे आहे त्या वास्तूंचे जतन, संवर्धन कसे होईल, यावर भर राहणार आहे. त्यासाठी रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन आराखडा करीत आहे. आराखडा तयार झाल्यानंतर निधीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. भुईकोट किल्ल्यातील खंदकात वाढलेली झाडे काढणे, बुरुज ढासळणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या जातील. किल्ल्यासाठी दोन वर्षांपूर्वी ४ कोटी ८९ लाख निधी मंजूर झाला होता. त्यापैकी फक्त ५० लाखांचाच निधी मिळाला होता. त्याच आराखड्यात बदल करून पुन्हा तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.

-----------

‘व्हिजन’पेक्षा ‘मिशन’ महत्त्वाचे

काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात ‘व्हिजन-२०२०’ ही संकल्पना सादर करण्यात आली होती. यामध्ये पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याबाबत संकल्पना सादर करण्यात आल्या होत्या. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, व्हिजन हे २०-२५ वर्षांचे असू शकते. मात्र आम्ही काम करताना ते मिशन म्हणून हाती घेतो. त्यामध्ये कालावधी निश्चित असतो, त्याला कालमर्यादा असतात. त्यामुळे ‘व्हिजन’पेक्षा ‘मिशन’वरच प्रशासनाचा भर आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविणे आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हे सध्या प्रशासनाचे ‘मिशन’ आहे. तीर्थस्थळांचाही टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.