शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

शेतकऱ्यांविरोधी निर्णय खपवून घेणार नाही

By admin | Updated: August 9, 2014 00:20 IST

शेतकऱ्यांच्या नाराजीचा परिणाम मतपेटीतून दिसून येईल असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.

देवळाली प्रवरा/श्रीरामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली मात्र त्याचा पहिला फटका देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. महाराष्ट्रातील विधानसभेच्या अगोदर केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबतचे धोरणात बदल केला नाही तर शेतकऱ्यांच्या नाराजीचा परिणाम मतपेटीतून दिसून येईल असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.देवळाली प्रवरा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही महायुतीचा घटक पक्ष असलो तरी शेतकऱ्यांच्या विरोधातील निर्णयांना आमचा कायम विरोध असेल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारवरचा दबाव वाढवण्यिाची गरज त्यांनी व्यक्त केली. सदाभाऊ खोत म्हणाले की, निवडणूक काळात लोकांना १५ दिवस गुंगीत ठेवून पाच वर्षे मजा मारणारांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. मोदींना पाठींबा दिला म्हणजे ‘घरजावई’ झालो नाही, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला तर त्यांनाही सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा शेट्टीकडे दिला मात्र त्यांनी कोरडे यांना जिल्हाध्यक्षपदावर राहण्याचे आदेश दिले. कांताभाऊ कदम, बाळासाहेब जाधव, बाबाकाका देशमुख, विठ्ठलराव शेळके, देठे आदींची भाषणे झाली. डॉ.सुधीर क्षीरसागर, बाबा कदम, रवींद्र मोरे, सचिन चौधरी, भगिरथ पवार आदींसह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)