शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी भरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत ...

शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर होणार नाही. मात्र, काही प्रमाणात का होईना, दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी शासन भरणार का, अशी आशा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्याच्या निमित्त शेतकऱ्यांना आहे.

तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. जवळपास दहा गावे पाण्याखाली गेली. या गावांचा संपर्कही तुटला होता. खेडोपाडी, तांडी, वस्तीवर जाणारे लहान-मोठे पूल रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद पडली. तालुक्यातील नंदिनी, नानी नदीकाठच्या गावांना सर्वाधिक मोठा फटका बसला. वरील भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नंदिनी, नानी नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत असताना, छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांचे येणारे पाणी सदर नदीमध्ये प्रवेश करू शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांचे पाणी आसपासच्या शिवारात पसरले. सात ते आठ दिवस या भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे उडीद, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, कांदा, तूर, उसाचे नुकसान झाले.

अतिवृष्टीची शेवगाव मंडळामध्ये सर्वाधिक ११० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. अवघ्या काही दिवसांत पावसाने वर्षभराची सरासरी ओलांडली. आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस झाला. बहुतांश शेतीमधील खरिपाची पिके नष्ट झाली. बी-बियाणे, खते, औषधी व संपूर्ण मशागतीची मेहनत वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे. तालुक्यात ५२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झाली होती. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून २ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात याहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

यामध्ये अनेक घरांची पडझड झाली. पुराच्या पाण्यामध्ये शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, गाय, म्हैस, बैल ही जनावरे व शेती अवजारे, घरातील भांडीकुंडी वाहून गेली. घरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने अनेकांना बेघर व्हावे लागले. अनेक कुटुंबे विखुरली गेली.

---

‘ती’ गावे सोडून अन्य गावांचे काय?

मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्रानुसार पावसाची नोंद होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वत्र कमी-जास्त पाऊस होतो. तालुक्यातील अनेक गावांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. परिणामी, अनेक ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मूळकुज होऊन त्याचा परिणाम निघणाऱ्या उत्पादनावर होईल. त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कधी होणार, महसूल विभाग पंचनामे करण्याचे आदेश कधी देणार, त्यामुळे ‘ती’ बाधित गावे सोडून इतर गावांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.