शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी भरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत ...

शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर होणार नाही. मात्र, काही प्रमाणात का होईना, दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी शासन भरणार का, अशी आशा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्याच्या निमित्त शेतकऱ्यांना आहे.

तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. जवळपास दहा गावे पाण्याखाली गेली. या गावांचा संपर्कही तुटला होता. खेडोपाडी, तांडी, वस्तीवर जाणारे लहान-मोठे पूल रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद पडली. तालुक्यातील नंदिनी, नानी नदीकाठच्या गावांना सर्वाधिक मोठा फटका बसला. वरील भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नंदिनी, नानी नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत असताना, छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांचे येणारे पाणी सदर नदीमध्ये प्रवेश करू शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांचे पाणी आसपासच्या शिवारात पसरले. सात ते आठ दिवस या भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे उडीद, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, कांदा, तूर, उसाचे नुकसान झाले.

अतिवृष्टीची शेवगाव मंडळामध्ये सर्वाधिक ११० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. अवघ्या काही दिवसांत पावसाने वर्षभराची सरासरी ओलांडली. आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस झाला. बहुतांश शेतीमधील खरिपाची पिके नष्ट झाली. बी-बियाणे, खते, औषधी व संपूर्ण मशागतीची मेहनत वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे. तालुक्यात ५२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झाली होती. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून २ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात याहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

यामध्ये अनेक घरांची पडझड झाली. पुराच्या पाण्यामध्ये शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, गाय, म्हैस, बैल ही जनावरे व शेती अवजारे, घरातील भांडीकुंडी वाहून गेली. घरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने अनेकांना बेघर व्हावे लागले. अनेक कुटुंबे विखुरली गेली.

---

‘ती’ गावे सोडून अन्य गावांचे काय?

मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्रानुसार पावसाची नोंद होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वत्र कमी-जास्त पाऊस होतो. तालुक्यातील अनेक गावांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. परिणामी, अनेक ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मूळकुज होऊन त्याचा परिणाम निघणाऱ्या उत्पादनावर होईल. त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कधी होणार, महसूल विभाग पंचनामे करण्याचे आदेश कधी देणार, त्यामुळे ‘ती’ बाधित गावे सोडून इतर गावांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.