शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी भरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत ...

शेवगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तालुक्याला झोडपले. हजारो हेक्टर शेतामधील पिके पाण्याखाली गेली. आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर होणार नाही. मात्र, काही प्रमाणात का होईना, दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची रिती झालेली झोळी शासन भरणार का, अशी आशा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्याच्या निमित्त शेतकऱ्यांना आहे.

तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. जवळपास दहा गावे पाण्याखाली गेली. या गावांचा संपर्कही तुटला होता. खेडोपाडी, तांडी, वस्तीवर जाणारे लहान-मोठे पूल रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद पडली. तालुक्यातील नंदिनी, नानी नदीकाठच्या गावांना सर्वाधिक मोठा फटका बसला. वरील भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नंदिनी, नानी नदीचे पात्र काठोकाठ भरून वाहत असताना, छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांचे येणारे पाणी सदर नदीमध्ये प्रवेश करू शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांचे पाणी आसपासच्या शिवारात पसरले. सात ते आठ दिवस या भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे उडीद, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, कांदा, तूर, उसाचे नुकसान झाले.

अतिवृष्टीची शेवगाव मंडळामध्ये सर्वाधिक ११० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. अवघ्या काही दिवसांत पावसाने वर्षभराची सरासरी ओलांडली. आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस झाला. बहुतांश शेतीमधील खरिपाची पिके नष्ट झाली. बी-बियाणे, खते, औषधी व संपूर्ण मशागतीची मेहनत वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे. तालुक्यात ५२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झाली होती. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून २ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात याहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

यामध्ये अनेक घरांची पडझड झाली. पुराच्या पाण्यामध्ये शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, गाय, म्हैस, बैल ही जनावरे व शेती अवजारे, घरातील भांडीकुंडी वाहून गेली. घरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने अनेकांना बेघर व्हावे लागले. अनेक कुटुंबे विखुरली गेली.

---

‘ती’ गावे सोडून अन्य गावांचे काय?

मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्रानुसार पावसाची नोंद होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वत्र कमी-जास्त पाऊस होतो. तालुक्यातील अनेक गावांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. परिणामी, अनेक ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मूळकुज होऊन त्याचा परिणाम निघणाऱ्या उत्पादनावर होईल. त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कधी होणार, महसूल विभाग पंचनामे करण्याचे आदेश कधी देणार, त्यामुळे ‘ती’ बाधित गावे सोडून इतर गावांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.