शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:52 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे.

योगेश गुंड,

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली कि सर्वांनाच साकळाई योजनेची आठवण होते. निवडणूक संपली कि साकळाई योजना पुन्हा विजनवासात निघून जाते. हा गेल्या २० वर्षांचा सर्वसामान्य शेतक-यांचा अनुभव आहे. यावेळीही नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजना गाजू लागली आहे. आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा विषय गेल्याने साकळाई चे स्वप्न आता तरी सत्यात उतरेल का हाच प्रश्न ३५ गावातील शेतक-यांना पडला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण म्हसोबा, आंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.१९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. त्यानंतर मात्र या योजनेचा फक्त राजकीय भांडवल करण्यासाठीच वापर करण्यात आला. अनेकांनी याच योजनेच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. फक्त निवडणुका पुरता साकळाई चा विषय चर्चेत आल्याने या योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली नाही. यामुळे २० वर्षांपासून या योजनेचे फक्त गाजरच दाखवण्यात येत आहे.काही महिन्यापूर्वी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच रुई छत्तीशी येथे मोठे जन आंदोलन उभे राहिले. यात आजी माजी आमदार, आजी माजी खासदार तसेच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणारे मातब्बर नेते सहभागी झाले होते. मंगळवारी डॉ.सुजय विखे यांनी याच साकळाई च्या प्रश्नाबात मुख्यमंत्री यांच्याशी बैठक आयोजीत केली. नेमक्या याच दिवशी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना साकळाई चे निवदेन दिले. विखे व पाचपुते यांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगर तालुक्यात चर्चिली जाणारी योजना २० वर्षानंतर मंत्रालयात चर्चिली गेली. यामुळे योजनेबाबत आशावाद निर्माण झाला आहे.श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील जी गावे या योजनेच्या कक्षेत येतात ती कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत. हि योजना पूर्ण झाली तर या दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव, आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्यातरी स्वप्न वत वाटणारी हि योजना सत्यात कधी येणार हाच प्रश्न या योजनेत येणा-या गावातील शेतक-यांना पडला आहे. श्रेय कोणी पण घ्या पण योजना मार्गी लावा अशीच मागणी येथील शेतक-यांची आहे.काय आहे साकळाई योजनाकुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ किलोमीटर लांब असलेल्या साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डीलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ किलोमीटरच्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर