शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:52 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे.

योगेश गुंड,

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली कि सर्वांनाच साकळाई योजनेची आठवण होते. निवडणूक संपली कि साकळाई योजना पुन्हा विजनवासात निघून जाते. हा गेल्या २० वर्षांचा सर्वसामान्य शेतक-यांचा अनुभव आहे. यावेळीही नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजना गाजू लागली आहे. आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा विषय गेल्याने साकळाई चे स्वप्न आता तरी सत्यात उतरेल का हाच प्रश्न ३५ गावातील शेतक-यांना पडला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण म्हसोबा, आंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.१९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. त्यानंतर मात्र या योजनेचा फक्त राजकीय भांडवल करण्यासाठीच वापर करण्यात आला. अनेकांनी याच योजनेच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. फक्त निवडणुका पुरता साकळाई चा विषय चर्चेत आल्याने या योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली नाही. यामुळे २० वर्षांपासून या योजनेचे फक्त गाजरच दाखवण्यात येत आहे.काही महिन्यापूर्वी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच रुई छत्तीशी येथे मोठे जन आंदोलन उभे राहिले. यात आजी माजी आमदार, आजी माजी खासदार तसेच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणारे मातब्बर नेते सहभागी झाले होते. मंगळवारी डॉ.सुजय विखे यांनी याच साकळाई च्या प्रश्नाबात मुख्यमंत्री यांच्याशी बैठक आयोजीत केली. नेमक्या याच दिवशी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना साकळाई चे निवदेन दिले. विखे व पाचपुते यांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगर तालुक्यात चर्चिली जाणारी योजना २० वर्षानंतर मंत्रालयात चर्चिली गेली. यामुळे योजनेबाबत आशावाद निर्माण झाला आहे.श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील जी गावे या योजनेच्या कक्षेत येतात ती कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत. हि योजना पूर्ण झाली तर या दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव, आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्यातरी स्वप्न वत वाटणारी हि योजना सत्यात कधी येणार हाच प्रश्न या योजनेत येणा-या गावातील शेतक-यांना पडला आहे. श्रेय कोणी पण घ्या पण योजना मार्गी लावा अशीच मागणी येथील शेतक-यांची आहे.काय आहे साकळाई योजनाकुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ किलोमीटर लांब असलेल्या साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डीलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ किलोमीटरच्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर