शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:52 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे.

योगेश गुंड,

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली कि सर्वांनाच साकळाई योजनेची आठवण होते. निवडणूक संपली कि साकळाई योजना पुन्हा विजनवासात निघून जाते. हा गेल्या २० वर्षांचा सर्वसामान्य शेतक-यांचा अनुभव आहे. यावेळीही नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजना गाजू लागली आहे. आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा विषय गेल्याने साकळाई चे स्वप्न आता तरी सत्यात उतरेल का हाच प्रश्न ३५ गावातील शेतक-यांना पडला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण म्हसोबा, आंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.१९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. त्यानंतर मात्र या योजनेचा फक्त राजकीय भांडवल करण्यासाठीच वापर करण्यात आला. अनेकांनी याच योजनेच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. फक्त निवडणुका पुरता साकळाई चा विषय चर्चेत आल्याने या योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली नाही. यामुळे २० वर्षांपासून या योजनेचे फक्त गाजरच दाखवण्यात येत आहे.काही महिन्यापूर्वी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच रुई छत्तीशी येथे मोठे जन आंदोलन उभे राहिले. यात आजी माजी आमदार, आजी माजी खासदार तसेच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणारे मातब्बर नेते सहभागी झाले होते. मंगळवारी डॉ.सुजय विखे यांनी याच साकळाई च्या प्रश्नाबात मुख्यमंत्री यांच्याशी बैठक आयोजीत केली. नेमक्या याच दिवशी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना साकळाई चे निवदेन दिले. विखे व पाचपुते यांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगर तालुक्यात चर्चिली जाणारी योजना २० वर्षानंतर मंत्रालयात चर्चिली गेली. यामुळे योजनेबाबत आशावाद निर्माण झाला आहे.श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील जी गावे या योजनेच्या कक्षेत येतात ती कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत. हि योजना पूर्ण झाली तर या दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव, आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्यातरी स्वप्न वत वाटणारी हि योजना सत्यात कधी येणार हाच प्रश्न या योजनेत येणा-या गावातील शेतक-यांना पडला आहे. श्रेय कोणी पण घ्या पण योजना मार्गी लावा अशीच मागणी येथील शेतक-यांची आहे.काय आहे साकळाई योजनाकुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ किलोमीटर लांब असलेल्या साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डीलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ किलोमीटरच्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर