शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

खासदार बोलणारा हवा की न बोलणारा : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:05 IST

लोकसभेची निवडणूक ही पक्षाची असली तरी, उमेदवारांची तुलना करण्याची संधी मतदारांसमोर आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न कोण मांडतो याला महत्व आहे.

अहमदनगर : लोकसभेची निवडणूक ही पक्षाची असली तरी, उमेदवारांची तुलना करण्याची संधी मतदारांसमोर आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न कोण मांडतो याला महत्व आहे. मी घरातला की बाहेरचा या चर्चेला महत्व देण्यापेक्षा लोकांसाठी उपलब्ध होऊन, अभ्यास करुन प्रश्न सोडविणारा खासदार तुम्हाला हवा की, साडेचार वर्षात विधानसभेत फक्त दोन मिनिटे बोलणारा हवा याचा विचार करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.नगर तालुक्यातील भोरवाडी, चास, सोनेवाडी, कामरवाडी, सारोळा कासार आणि अकोळनेर येथे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. निवडणुकीतील भूमिका मतदारांसमोर मांडताना त्यांनी तालुक्यातील आणि मतदार संघातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकसभेत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा खासदार पाठविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनीही दक्षिणेचे नेतृत्व करताना जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. मात्र त्यांना काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. उत्तरेचे अतिक्रमण म्हणून आमच्यावर निरर्थक टीका केली जाते. पण अतिक्रमण करण्याची सवय कोणाची आहे? हे नगरकर चांगलेच जाणून आहेत. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचा इतिहास सर्वांच्या समोर आहे. या महाविद्यालयावर कोणी कसे अतिक्रमण केले हे जनता विसरलेली नाही. एक काळ आयुर्वेद महाविद्यालयाचा संपूर्ण राज्यात नावलौकिक होता. आज अवस्था काय आहे? एका राजकीय पक्षाचे कार्यालय म्हणून ते ओळखले जात असल्याची टीका विखे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलमंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली. याप्रसंगी रामदास भोर, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अरुण होळकर, राजेंद्र भगत, बाळासाहेब पोटघन आदी याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019