शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

का होतो ऊस दराचा संघर्ष?

By मिलिंदकुमार साळवे | Updated: December 8, 2018 16:06 IST

राज्यात दरवर्षीच साखर हंगाम सुरू झाला की ऊस दराचा संघर्ष सुरू होतो. सांगली, सातारा, कोल्हापुरात याची ठिणगी पडली की हा वणवा पेटत पेटत अहमदनगरपर्यंत येऊन ठेपतोच.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यात दरवर्षीच साखर हंगाम सुरू झाला की ऊस दराचा संघर्ष सुरू होतो. सांगली, सातारा, कोल्हापुरात याची ठिणगी पडली की हा वणवा पेटत पेटत अहमदनगरपर्यंत येऊन ठेपतोच. यावर्षी राज्यभरातच दुष्काळाची गडद छाया आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी अडचण नको म्हणून शेतकरी संघटनांनी नेहमीचा आक्रमकपणा,आक्रस्ताळेपणा बाजूला ठेऊन आतापर्यंत तरी संयम व शांततेची भूमिका घेतलेली आहे. पण आता अहमदनगर जिल्ह्यातील संघटनाही आक्रमक होऊ लागल्या आहेत.कोल्हापूरच्या पट्ट्यात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दबदबा आहे. त्यांच्यापासून दूर जाऊन राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आहे. दोघांनीही २०१८-१९ च्या हंगामाच्या तोंडावर ऊस परिषदा घेऊन नेहमीप्रमाणे शड्डू ठोकून आवाज काढला. नंतर एफआरपी अधिक २०० रूपयांवर तोडगा निघून तेथे कारखानदार व शेतकरी संघटनांनी तेथील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत सामंजस्याने तोडगा काढला. एकेकाळी राज्यातील साखरेचे आगार समजल्या जाणाºया अहमदनगर जिल्ह्यात मात्र आता डिसेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी वाढीव ऊस दराची कोंडी फुटलेली नाही. ही कोंडी फोडण्यासाठीच शेतकरी संघटनांच्या विनंतीनुसार प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी कारखानदार व संघटनांमध्ये समन्वयकाची भूमिका वठवित शुक्रवारी एक बैठक घेतली. पण कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त काही देण्यास असमर्थता दर्शविली. हंगाम सुरू होऊन दीड-दोन महिने झाले तरी काही कारखान्यांचे ऊस दराचे धोरणच ठरलेले नाही. या बैठकीत तर काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा १ रूपयापासून १५ रूपयापर्यंत जादा भाव देण्याचे जाहीर करून शेतक-यांची एकप्रकारे चेष्टाच केली. कोल्हापूर विभागातील कारखान्यांना प्रतिटन एफआरपी अधिक २०० रुपए ऊस दर देणे शक्य होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांना ते का शक्य नाही? येथील अनेक कारखान्यांमध्ये, अल्कोहोल-देशी दारू, स्पिरीट, इथेनॉल, सहवीज निर्मिती विविध प्रकारची रसायने अशा उपपदार्थांची निर्मिती होऊन त्याद्वारे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. पण बरेच कारखानदार आर्थिक चलाखी दाखवून या उपपदार्थांच्या उत्पन्नातील वाट्यापासून ऊस उत्पादकांना वेगवेगळी कारणे, तर्क सांगून दूर ठेवतात. या उपपदार्थांच्या उत्पन्नात शेतक-यांनाही वाटा द्या, अशी शेतकरी संघटनांची मागणी त्यामुळेच चुकीच वाटत नाही.भारत सरकारने नेमलेल्या कृषी मूल्य आयोगाकडून देशभरातील साखर कारखान्यांना शेतक-यांकडून पुरवठा केलेल्या जाणाºया उसासाठी एफआरपी अर्थात रास्त व किफायतशीर किंमत (फेअर अँड रेम्युनिरेटिव्ह प्राईस) दरवर्षी निश्चित केली जाते. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार उसाची ही किंमत ठरविते. त्यानुसार केंद्रीय अर्थ व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीइए) २०१७-१८ मध्ये प्रति क्विंटल २५५ रुपए एफआरपी जाहीर केली होती. यात २०१८-१९ साठी २० रूपयांची वाढ करून केंद्र सरकारने या वर्षासाठी किमान १० टक्के साखर उतारा गृहित धरून प्रति क्विंटल २७५ एफआरपी निश्चित केली आहे. पुढील प्रत्येक १ टक्का उता-यासाठी प्रति क्विंटल २ रुपए ७५ पैसे ठरवून देण्यात आले आहेत.कोल्हापूर विभागात नेहमीप्रमाणे शेतकरी संघटनांना ३४००/३५०० रुपये एकरकमी पहिली उचल देण्याची मागणी करून आंदोलनाचा झेंडा फडकविला. पण नंतर मात्र एफआरपी अधिक २०० रूपयांवर तोडगा निघाला. इकडे अहमदनगर जिल्ह्यात मात्र एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास कारखानदार तयार नाहीत. गेल्यावर्षी ऊस दर आंदोलनादरम्यान खानापूर (ता. शेवगाव) येथे शेतक-यांवर गोळीबार झाला होता. यंदा कारखानदार व संघटनांची पहिलीच बैठक शुक्रवार ७ डिसेंबरला होऊनही त्यातून संघटनांच्या व पर्यायाने शेतक-यांच्या पदरात काही पडले नाही. दरवर्षीच हंगाम सुरू झाल्यानंतर कारखानदार विरूद्ध शेतकरी संघटना असा संघर्ष उभा राहतो. कारखानदारांना नेहमीच आरोपी पिंज-यात उभे केले जाते. त्यातून शब्दाला शब्द वाढत जाऊन संघर्षाचा भडका उडतो. बळीराजाच्या घामाचे रास्त दाम मिळालेच पाहिजे, पण घामाला दाम देणारे कारखानेही टिकले पाहिजेत, अशी भूमिका आता संघटनांचे काही समंजस नेते घेऊ लागले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे.साखर उतारा कमी दाखवून, काटा मारून, वाहतूक खर्च जास्त दाखवून एफआरपी कमी दाखविण्याच्या उद्योगातून कारखानदार शेतक-यांची फसवणूक करीत असल्याच्या संघटनांच्या आरोपाबाबतही कारखानदारांनी आत्मचिंतन करीत दूध का दूध करून दाखविले पाहिजे. गेल्याच महिन्यात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सभेत बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या वयोवृद्ध शेतक-यास धाकदपटशा दाखवून, त्याला धक्काबुक्की करून त्याचा आवाज दडपण्याचा प्रकार झाला. ही बाब कारखान्यांमध्ये किती लोकशाही आहे, हे स्पष्ट करणारी आहे. पारदर्शीपणा आला तरच कारखानदार व शेतक-यांमधील संघर्ष कमी होईल.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर