शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

घोडमध्ये पाणी शिल्लक असताना पिके का जाळताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:21 IST

काष्टी : घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र घोडचे आवर्तन ...

काष्टी : घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र घोडचे आवर्तन लांबणीवर टाकले आहे. मग घोड धरणात पाणी शिल्लक असताना पिके का जाळताय? असा सवाल जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिलराव पाचपुते यांनी केला आहे.

घोड धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. धरणात सध्या ४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे आहे. त्या परिस्थितीत तीन आवर्तने शेतीसाठी सुटू शकतात.

कालवा सल्लागार समितीची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना कुठेही विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. जर १० फेब्रुवारीला घोडचे आवर्तन सुटले नाहीतर धरणात पाणी असून शेतकऱ्यांचे ऊस फळबागा इतर पिके जळून जाणार आहेत. तरी तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही पाचपुते यांनी दिला आहे.

....

टाळे लावण्याचा इशारा

घोड धरणातून २० जानेवारीपासून पाणी सोडले तरच घोड लाभक्षेत्रातील पिके जिवंत राहतील. याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा मढेवडगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयास शेतकरी टाळे लावतील, असा इशारा शिवाजीराव पाचपुते व अनिलराव पाचपुते यांनी दिला आहे.

...

रास्ता रोको इशारा

हंगेवाडी परिसरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे . घोडचे आवर्तन आठ दिवसाच्या आत न सोडल्यास नगर-दौंड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी दिला आहे.

....

तसा अहवाल पाठविणार

घोड कालव्यावरील पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी घोडचे आवर्तन लवकर सोडावे याबाबत निवेदन दिले तर घोडचे आवर्तन नियोजनात बदल करावा असा वरिष्ठांना अहवाल पाठविणार आहे.

-स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक २.

..

१९घोड डॅम

....