शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

घोडमध्ये पाणी शिल्लक असताना पिके का जाळताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:21 IST

काष्टी : घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र घोडचे आवर्तन ...

काष्टी : घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र घोडचे आवर्तन लांबणीवर टाकले आहे. मग घोड धरणात पाणी शिल्लक असताना पिके का जाळताय? असा सवाल जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिलराव पाचपुते यांनी केला आहे.

घोड धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. धरणात सध्या ४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे आहे. त्या परिस्थितीत तीन आवर्तने शेतीसाठी सुटू शकतात.

कालवा सल्लागार समितीची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना कुठेही विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. जर १० फेब्रुवारीला घोडचे आवर्तन सुटले नाहीतर धरणात पाणी असून शेतकऱ्यांचे ऊस फळबागा इतर पिके जळून जाणार आहेत. तरी तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही पाचपुते यांनी दिला आहे.

....

टाळे लावण्याचा इशारा

घोड धरणातून २० जानेवारीपासून पाणी सोडले तरच घोड लाभक्षेत्रातील पिके जिवंत राहतील. याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा मढेवडगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयास शेतकरी टाळे लावतील, असा इशारा शिवाजीराव पाचपुते व अनिलराव पाचपुते यांनी दिला आहे.

...

रास्ता रोको इशारा

हंगेवाडी परिसरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे . घोडचे आवर्तन आठ दिवसाच्या आत न सोडल्यास नगर-दौंड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी दिला आहे.

....

तसा अहवाल पाठविणार

घोड कालव्यावरील पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी घोडचे आवर्तन लवकर सोडावे याबाबत निवेदन दिले तर घोडचे आवर्तन नियोजनात बदल करावा असा वरिष्ठांना अहवाल पाठविणार आहे.

-स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक २.

..

१९घोड डॅम

....