शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे ‘साकळाई’ का दिली नाही? :जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:22 IST

वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे.

वाळकी : वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे. पुढील सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचेच येणार आहे. त्यावेळी साकळाई पाणी योजनेचा प्रश्न आम्हीच मार्गी लावू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी वाळकी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांसह मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, अच्छे दिन आनेवाले है, शेतकऱ्यांना दुप्पट भाव, महिलांना संरक्षण, बेरोजगांना रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा, कर्जमाफी असा केवळ खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडून हे सरकार सत्तेत आले. अशा निष्क्रिय भाजप सरकारला जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. उमेदवार थोरामोठ्यांचा आदर करणारा असावा, वडिलधाऱ्यांचा मानसन्मान करणारा असावा, परंतु तसे संस्कार विरोधी उमेदवारावर दिसत नाहीत. असा उमेदवार लोकसभेत जाता कामा नये. आमदार राहुल जगताप, आमदार अरूण जगताप, घनश्याम शेलार यांचीही भाषणे झाली.यावेळी राजेंद्र नागवडे, राजेंद्र फाळके, माधवराव लामखडे, रोहिदास कर्डिले, अशोक बाबर, निर्मला मालपाणी, शारदा लगड, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरड, रमेश भांबरे, अंबादास गारूडकर, किसनराव लोटके, प्रताप शेळके, सबाजी गायकवाड, भाऊसाहेब बोठे, देवराम कासार, शरद बोठे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019