शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे ‘साकळाई’ का दिली नाही? :जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:22 IST

वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे.

वाळकी : वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे. पुढील सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचेच येणार आहे. त्यावेळी साकळाई पाणी योजनेचा प्रश्न आम्हीच मार्गी लावू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी वाळकी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांसह मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, अच्छे दिन आनेवाले है, शेतकऱ्यांना दुप्पट भाव, महिलांना संरक्षण, बेरोजगांना रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा, कर्जमाफी असा केवळ खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडून हे सरकार सत्तेत आले. अशा निष्क्रिय भाजप सरकारला जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. उमेदवार थोरामोठ्यांचा आदर करणारा असावा, वडिलधाऱ्यांचा मानसन्मान करणारा असावा, परंतु तसे संस्कार विरोधी उमेदवारावर दिसत नाहीत. असा उमेदवार लोकसभेत जाता कामा नये. आमदार राहुल जगताप, आमदार अरूण जगताप, घनश्याम शेलार यांचीही भाषणे झाली.यावेळी राजेंद्र नागवडे, राजेंद्र फाळके, माधवराव लामखडे, रोहिदास कर्डिले, अशोक बाबर, निर्मला मालपाणी, शारदा लगड, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरड, रमेश भांबरे, अंबादास गारूडकर, किसनराव लोटके, प्रताप शेळके, सबाजी गायकवाड, भाऊसाहेब बोठे, देवराम कासार, शरद बोठे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019